Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Sunday, May 25, 2014

0 कबीराचे दोहे भाग ५


मनुष्य जसजसा आधुनिकतेकडे मार्गक्रमण करू लागला तसतसा तो भौतीकातावादी होऊ लागला.
त्याला वाटू लागले मी राजमहालाच ऐश्वर्य भोगायला हवे. माझा जन्म त्याच साठी झालाय. मग हे ऐश्वर्य
भोगण्यासाठी वाटेल ते मार्ग अवलंबले तरी चालतील अशी त्याची भूमिका होऊ लागली. परंतु हे प्राप्त करण्यासाठी
थाबंयची सुद्धा तयारी नाही. सर्व कसे एका रात्रीत हवे. पैसा , ऐश्वर्य, नाव. यासाठी जीवाचं रान करण्याची तयारी.
मग या रानातून भटकताना होणारी जीवाची तगमग याकडे दुर्लक्ष.. इथेहि थांबायची तयारी नाही तर माझ्या ७ पिढ्या कशा खातील याचा विचार.
याच विचारांमुळे  २ जी घोटाळा, तेलगी घोटाळा , सत्यम घोटाळा, बोफोर्स घोटाळा, चारा घोटाळा, हे  तर काय आम्ही हुतात्म्यांच्या
शवपेटीतही घोटाळा करण्यास शरम बाळगत नाही. त्यानंतर  जेल, तरी निर्लाजाप्रमाणे जीवन आनंदाने जगणे, अशा संस्कृतीचा जन्म.

आयुष्यभर नाशवंत वस्तूंची जमवाजमव करीत असतात त्यामुळे इर्षा, द्वेष, मत्सर, क्रोध, अहंकार हे शत्रू त्यास सतावत असतात.
याचा परिणाम म्हणून चिंता, त्रागा, ताण या विकारांना आमंत्रण. यापासून सुटकारा मिळण्य साठी मग मानसिक तज्ञ, स्ट्रेस मैनेजमेंट चे क्लास्सेस.,
संधिसाधू संताचा सहारा घ्यावा लागतो. असे हे दुष्ट  चक्र चालू राहते. आणि जीवनाच्या अंती लक्षात येते कि फलंदाजी, गोलंदाजी आणि  क्षेत्ररक्षण
या सर्व आघाड्यांवर आपण विफल ठरतो  आणि एका दारूण पराभवाला सामोरे जावे लागते. तेव्हा लक्षात येते कि आपण परमात्म्याच्या
ओउट ऑफ रेंज गेलेलो आहोत.  मग सिकंदर सारख्या जगजेत्यालाही म्हणावे लागते माझी सर्व संपती घे ऐर्श्वर्य घे,  राज्य घे पण मला
काही क्षण दे 'जगण्यासाठी'. पण सर्व निरर्थक, वेळ येते आणि आपणास म्हणावेच लागते ' आम्ही जातो  आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा.
  या सर्व दुक्खातून दूर जाण्यासाठी  काबिर्दस्जी म्हणतात,

साई इतना दिजिए जामे कुटुम समाय
मै भी ना भुखा रहु , साधू ना भुका जाये

काबिर्दज्साजी परमात्म्याजवळ एवह्दिच मागणी करतात कि, मला  एव्हडाच दे ज्यात माझ कुटुंब चालेल, एव्हडाच दे कि मला
दोन वेळेचं जेवण मिळेल आणि येणारही उपाशी जाणार नाही. किती हि एका दिवसाची मागणी. यात उद्याचाच विचार नाही मग भविष्याचा प्रश्नच उरत नाही.
सात जन्माचा तर नाहीच नाही. इतक मन समाधानी असायला हव म्हणजे जे कर्म होत ते इर्षा, द्वेष, मत्सर, क्रोध, अहंकार याच्या शिवाय होते.आणि मग
जीवनात आनंद भरून येतो.

 दत्तात्रय पटवर्धन

वाचा

शायरीचा गुलदस्ता. भाग १ 

बुद्धिबळातील प्यादे.

कबीराचे दोहे भाग ४ 

कबीराचे दोहे भाग 3

वळून पाहताना ! भाग 1

अनामिक का सफर : १

 

 

 

 

 

No comments: