Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Friday, November 28, 2014

0 बुद्धिबळाचा इतिहास : 2


बुद्धिबळ  या खेळाच्या इतिहासाची पाच कालखंडात  विभागणी होते. 
संस्कृत  काळ ( ए. डी.. ७०० पर्यंत चा काळ);
पर्शियन काळ ( ए. डी. ७०० ते ८०० );
अरेबिक काळ ( ए. डी. ८०० ते १००० );
मध्ययुगीन  काळ ( ए. डी. १००० ते १६०० );
आधुनिक काळ ( १६०० पासून आतापर्यंत.).
     संस्कृत काळात या खेळला चतुरंग म्हणून संबोधले जायचे. या खेळात चार खेळाडू चार रंगाच्या सोंगट्या घेऊन खेळत. या सोंगट्याचा रंग काळा, हिरवा, तांबडा, व पिवळा असे. प्रत्येक खेळाडूकडे राजा, हत्ती, घोडा, नौका तसेच चार प्यादी असायची. चार खेळाडूंपैकी एकमेकांसामोरील कर्नाट असलेले खेळाडू भागीदार/भिडू असायचे. या खेळाचा उल्लेख संस्कृत, पाली, आणि इतर बौद्ध साहित्यातही आढळतो. या सोंगट्याची पटावरील स्थिती हि आजच्या पेक्षा थोडी वेगळी  होती. नौका किवा रथ अगदी कडेला(flank), राजा तसेच मंत्री  मध्ये, घोडा मंत्र्याच्या  जवळ. उद्देश लवकरात लवकर वेगाने बाहेर येता याव म्हणून.
      हा खेळ फासा वापरून खेळला जात होता. परंतु नंतर या खेळाला जुगाराचे रूप प्राप्त झाले. लोक खेळताना आपली बोटे, हात, पाय असे अवयवही डावावर लावू लागले. ह्या जुगाराच टोकाचं सर्वश्रुत उदाहरण म्हणजे महाभारतातील पांडव, कौरव, आणि शकुनी यांनी द्यूतात केलेला  अतिरेक. पुढे कडक, राजकीय निर्बंधा मुळे चतुरंग मधून फाशाचे उच्चाटन झाले चौघा ऐवजी हा खेळ दोघांमध्ये खेळला  जाऊ लागला. दुसऱ्या बाजीरावाच्या पदरी असणाऱ्या त्रीवेन्गादाचार्यानी बुद्धिबळावर संस्कृत मध्ये 'विलासमणिमंजरी' हा ग्रंथ लिहिला.   या खेळाबद्दल एक कथा नेहमी सांगितली जाते ती –
     राजा कैद याने अनेक युद्धे केली आणि अनेक प्रांत आपल्या राज्याला जोडून घेतले. इच्छेनुसार त्याला पैसा, संपत्ती, नाव, ऐश्वर्य सर्व काही मिळाल. कोणीही शत्रू म्हणून राहिला नाही. त्यामुळे युद्ध नाही. जीवन निरस कंटाळवाणे जाऊ लागले. शेवटी त्याने फर्मान काढले कि मला जो या कंटाळवाण्या  जीवनातून बाहेर काढेल त्याला योग्य ते बक्षी दिले जाईल. अनेकांनी अनेक प्रयत्न  केले पण सर्व विफल झाले. सरते शेवटी त्याच्या मंत्र्याने विचारांती एका खेळाची मांडणी केली, राजाला तो खेळ व त्याचे नियम समजावले व स्वत: राजाशी खेळू लागला. राजाला हा युद्ध सदृश खेळ खूप आवडला.
     आता राजाची वेळ होती शब्द पाळण्याची. राजा त्या म्हणाला, " सांग तुला काय हवे? तू जे मागशील ते तुला बक्षीस रुपात दिले जाईल. मग सोन, हिरे, पैसा जे हव ते माग.  मंत्री म्हणाला, मला जास्त काही नको. एक करा, या पटावर ६४ घर आहेत, पहिल्या घरात एक गव्हाचा दाणा, दुसऱ्या घरात दोन, तिसऱ्या घरात चार, चौथ्या घरात आठ असे दाणे ठेवत  जा. अंती सर्व मिळून जेवढे दाणे होतील तेव्हडे मला द्या. दरबारातील प्रत्येक जण या मागणीमुळे  मंत्र्यावर  हसू लागले. मंत्र्याला मुर्खात काढू लागले. राजाही आश्चर्यचकित झाला व म्हणाला बस एव्हडच!!! त्याने नोकरांना मंत्र्याची इच्छा लगेच पूर्ण करण्याचे आदेश दिले. सारे नोकर कामाला लागले.
     मंत्री मूर्ख ठरला कि राजा मंत्र्याची इच्छा पूर्ण करू शकलाआपणही वही आणि पेन घेऊन पहा गव्हाचे किती दाणे मंत्र्याने राजाकडे मागितले होते? आकडा मोठा होता तर किती मोठा! आकडा लहान होता तर इतकी शुल्लक मागणी करणारा मंत्री मूर्ख होता कि महामूर्ख?  बघा,६४ पैकी किती घरातील गव्हाचे दाणे मोजता येतात ते.
      हा आलोच पुढील लेखात गव्हाच्या दाण्यांचा हिशोब घेऊन!  

Thursday, November 27, 2014

0 बुद्धिबळाचा इतिहास : 1



बुद्धिबळ म्हटले कि आपल्याला महाभारतातील शकुनी, दुर्योधन आणि पांडव यांच्या द्यूताच्या खेळाची आठवण झाल्याशिवाय होत नाही. शकुनीचा तो कपटीपणा, त्याचं महाभारत या टीव्ही धारावाहिक मधील मिश्किल हास्य डोळ्यासमोरून तरळून जातं. द्तुताचा खेळ जो महाभारतात येतो तोच तो चतुरंगचा खेळ. हाच खेळ नंतर  भारत ते पर्शिया आणि पुढे युरोप असा प्रवास करता करता शेवटी आजचा बुद्धिबळ कसा झाला हा इतिहास अगदी रमणीय आहे. भारतातून पर्शियात गेल्यावर त्याच्या सोंगट्या मध्ये कसा बदल झाला. सोंगट्या चे कसे नवीन नामकरण झाले? राणी हि पटावर केव्हा आली व युध्धामैन्दानावर धुडगूस घातला. हे वाचताना मन अगदी रमून जात.

राजकुमारी अना कॉमनेना  ( Anna Comnena ) हिने आपल्या वडिलांचं  चरित्र लिहिलं. त्यात तिने वर्णन केलं कि बुद्धिबळ हा खेळ ग्रीस मध्ये अरब्स देशातून आला. ग्रीस देशात या खेळला Zatrikion म्हटले जात होते. अरेबियांस नि हा खेळ पर्शियनकडून  घेतला  व पर्शियात हा खेळ भारतातून आला. पर्शिया मध्ये हा खेळ राजा खुसरो ने आणला ज्याने पर्शियावर ४८ वर्ष्ये राज्य केले.

याचा विचार करून जर भारतात या खेळाची मुळं तपासली तर  लक्षात येते कि हा खेळ इ.सनाच्या ३००० वर्षे पूर्वीचा आहे., भविष्य पुराणात उल्लेख आहे कि राजा युधिष्ठीर व्यासांना विचारतो कि हा खेळ कसा खेळायचा, याच्या चाली कशा आहेत?
त्यावर व्यास , सोंगट्यानची   रचना कशी करायची हे सांगतात.. नंतर राजा हा कसा महत्वाचा आणि त्याची रक्षा कशी जरुरीची हे सांगतात. फासा  फेकल्यावर जर ५ आकडा आला तर राजा किव्वा एक प्यादे सरकवायचे, जर चार आकडा आला तर हत्ती, आणि तीन आकडा आला तर घोडा तसेच दोन आकडा आल्यावर शिप (उंट) सरकवायचा." पुढे व्यास प्रत्येक सोंगट्यानची चाल समजावतात. राजा एक घर कोणत्याही दिशेला चालतो. प्यादे एक घर पुढे आणि मारताना एक घर तिरकस, पुढील घरात. हत्ती त्याच्या इच्छेनुसार आडवा/ उभा कितीही घरं चालू शकतो ( फक्त रस्ता मोकळा असणे आवश्यक आहे).
शिप (बिशप ) फक्त दोन खरं तिरकस कोणत्याची दिशेला सरकू शकतो.  आणि घोडा हा अडीच घरं चालतो. राजा हा एक घर कोणत्याही दिशेने सरकतो."
अर्थात सध्याच्या खेळात कही सोंगट्याच्या  चाली  बदलल्या  आहेत.
चतुरंग म्हणंजे सैन्याचे चार भाग. 'चतुर' म्हणजे 'चार' आणि 'अंग' म्हणजे 'भाग'.  पायदळ, घोडदल, हत्ती आणि शिप ( chariots ) , एक राजा आणि त्याचा general  यांचा मिळून हा खेळ. हिंदू पुरातन युद्धपद्धतीच  हे एक चित्र.
व्यासांच्या वरील वर्णावरून लक्षात येत कि त्याकाळी राणी हि पटावर नव्हती. त्यामुळे राणीची पटावरील धमाल नव्हती. खेळ कसा निरस असेल ना?  बिशप ची चाल हि लिमिटेड होती. फक्त हत्ती हेच एक दूर पल्ल्याचं मिसाइल होतं. याच हत्तीला  'highway lover ' असेही संबोधतात. त्यामुळे हत्ती सोडला तर बाकीच्या सोंगट्यानची चाल मर्यादितच होती म्हणून  खेळात एकप्रकारचा रटाळपणा असावा. त्या काळी भारतात इतिहास लिहिण्याचा शिरस्ता नव्हता त्यामुळे याची पाळेमुळ शोधन कठीण  जातं. परंतु सहाव्या शतकात जेव्हा हा खेळ पर्शियात गेला तेव्हा या खेळाची माहिती इतिहासात मिळते. त्याकाळी सोंगट्या चित्रात दाखवल्याप्रमाणे मांडतात.