Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Tuesday, December 23, 2014

0 कबीराचे दोहे : भाग १६

इसाप  हा झांथस च्या घरी स्वयंपाकी होतो. त्याकाळी गुलाम ठेवले जात असतं. इसाप  हा असाच झांथस चा गुलाम होता. अत्यंत बुद्धीमानी, कमी उंचीचा व दिसायला अगदी कुरूपच. एके दिवशी झांथस कडे त्याचा मित्र येतो. झांथस इसापला म्हणाला कि आज माझा मित्र आलेला आहे त्याच्यासाठी सर्वात उत्तम पदार्थ बनवशील. जेवणाची वेळ झाली तेव्हा झांथस इसापला म्हणाला कि वाढायला सुरवात कर.. इसाप वाढायला लागतो आणि झांथस ते पाहून थक्कच होतो. काय केले असेल या इसापने? त्याने सर्व पदार्थ बोकडाच्याच जिभेचे. यावर झांथस म्हणाला कि, इसाप हे काय सर्व पदार्थ बोकडाच्याच जिभेचे? यावर इसाप म्हणाला कि, जगात जीभे एव्हडी उत्कृष्ट वस्तू दुसरी कोणतीच नाही आणि तुम्ही मला सर्वात उत्कृष्ट पदार्थ करायला सांगितले होते. झांथस  काहीच न बोलता शांत बसतो. मग रात्रीच्या भोजनासाठी सर्वात निकृष्ट पदार्थ बनवण्यास सांगतो. रात्र होते आणि दोघेजण जेवायला बसतात. पुन्हा पाहतात तो काय? पुन्हा बोकडाच्याच जीभा. यावर झांथस इसापकडे एक कटाक्ष टाकतो.   त्याची प्रष्णरूपी  नजर इसापला कळते व तो म्हणतो कि या जगतात जीभे एव्हडी वाईट गोष्ट काहीच नसेल. जीभच सर्वात निकृष्ट आहे.

बरोबर आहे कबीर दासजी म्हणतात,

कुटील वचन सबसे बुरा जासे होत न हार,
साधू वचन जल रूप है, बरसे अमृतधार.  (कबीर दास )

 
या जिभेतुन जेव्हा कटू वचन बाहेर पडतात त्यावेळेस कलह निर्माण होतो परंतु ज्यावेळेस याच जिभेतुन प्रेमाचे स्नेहाचे शब्द बाहेर पडतात तेव्हा हीच जीभ मात्र मैत्री जोडते. हि जीभच आहे जी मैत्री जोडते आणि  मैत्री तोडते. "अंधे का बेटा अंधा " हे शब्द जेव्हा या जिभेतुन पडतात तेव्हाच महाभारताच्या युद्धाची बीजे पेरली जातात. जिभेला झालेली जखम तर बरी होते परंतु जीभे मुळे झालेली जखम बरी होतं नाही.
एक संस्कृत सुभाषित सुद्धा हेच सांगते,
वाग्माधुर्यात सर्वलोकप्रियत्वम, वाक्पारुश्यात सर्वलोक अप्रियत्वम,
किंवा लोके कोकीलेनोपकार: , किंवा लोके गर्दाभेणाप्रकार: ||

मधुर बोलणारे सर्वांना  प्रिय होतात. कठोर वचनाने अप्रिय होतात. कोकिळेने जगावर असे कोणते उपकार केलेले आहेत तरी तो  सर्वांना आवडतो आणि गाढवाने  कुणाचे काय वाईट केले कि ते कोणालाच आवडत नाही. या सर्वांच एकच कारण आहे ती म्हणजे जीभ. म्हणूनच समजदार माणसे म्हणतात  "खाताना आणि बोलताना जिभेवर ताबा ठेवला पाहिजे.

 दत्तात्रय पटवर्धन

कबीराचे दोहे : भाग ७

कबीराचे दोहे : भाग ७
कबीराचे दोहे : भाग ७

कबीराचे दोहे : भाग ७

Thursday, December 18, 2014

0 पेशावर मध्ये विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या.

पेशावर मधील आर्मी स्कूल मध्ये बेछूट गोळीबार करून १३२ विद्यार्थ्यांची हत्या करण्याची बातमी जगभर पसरली आणि जग स्तब्ध झाले. प्रत्येकाच्या  मनात एकच प्रश्न  डोकावू लागला, मग आपण civilised कि uncivilised ? पेशावर मधील वारसक रस्त्यावरील हि शाळा पाकिस्तानी लष्करातर्फे चालवण्यात येते. या शाळेच्या परीक्षा सुरु होत्या आणि मंगळवारी  सकाळी साडे दहाच्या सुमारास  हा हल्ला करण्यात आला. निष्पाप विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या करण्याचे पापकृत्य घडवून आणले.
असे म्हणतात, Everything is fair in love and war . परंतु अशा युद्धाचेही काही नियम असतात उदा. नागरिक वस्तीत बॉम्ब हल्ला करू नये, दवाखान्यावर बॉम्ब हल्ला करू नये, जखमी सैनिकांना घेऊन जाणाऱ्या अम्बुलन्स वर बॉम्ब  हल्ला करू नये इ. युद्धाचेही  असे नियम असताना  आपण निष्पाप विद्यार्थ्याची हत्या करण्यापर्यंत मजल मारली.
पाकिस्तान मधील घटना ऐकल्यावर फैज अहमद "फैज" यांचा एक शेर आठवला. पाक हुकुमशाहीच वर्णन करताना त्यांनी म्हटले होते,

है लबरेज आहोँसे ठंडी हवाएँ,
उदासी में डूबी हुई है घटाए
मुहब्बत की दुनिया में शाम आ चुकी है,
सिह्यपोश है जिंदगी की फ़िज़ाए |

"हे असह्य गारठ्याच वातावरण दु:क्ख पूर्ण निश्वासांनी  कसं ओतप्रोत भरून गेलाय... कृष्ण घनमेघ कालोखांमुळे आणखीनच उदासवाणे भासताहेत .... प्रेमाच्या साम्राज्यात जणू सायंकाळ अंधारून आल्यागत झालंय .... सारं कसं आयुष्यच काळोखामुळे झाकोळून (सियहपोश)   टाकल्यागत झालंय ---- स्वातंत्र्याचा प्रकाशाच जणू नाहीसा झालाय  आणि सगळीकडे अंधारून आलाय"  आजही हे शब्द  पाकिस्तान च्या बाबतीत तंतोतंत लागू होतात.

परंतु याच वेळेस मरहूम साहीर लुधियानवी यांच्या 'जंग टलती रहे तो बेहतर है" या काव्याची  आठवण झाली, ते म्हणतात,

खून अपना हो या पराया हो ,
नस्ले आदम का खून है आखिर
जंग मश्रिक़ में हो के मगरिब में
आमने-आलम का खून है आखिर ||

बम घरोंपर गिरे के सरहद पर
रूहें-तामीर जख्म खाती है
खेत अपने जले की औरोंके
जीस्त फाको से तिलमिलाती है ||

टैंक आगे बढे की पीछे हटे
कोख धरती की बाँझ होती है
फतह का जश्न हो के हार का सोग
जिंदगी मय्यतो पे रोती  है ||

जंग तो खुदही इक मसअला है
जंग क्या मसलो का हल देगी
आग और खून आज बख्शेगी
भूख और एहतियाज कल देगी ||

इसलिए ए शरीफ इंसानो !
जंग टलती रहे तो बेहतर है,
आप और हम सभी के आँगन में
शम्मा जलती रहे तो बेहतर है||

आपण यातुन केव्हा शिकवण घेणार कोणास ठाऊक?

Sunday, December 14, 2014

0 कबीराचे दोहे : भाग १५


मी आणि बाप्या एकदा कॉफी हाउस मध्ये गेलो. महागड कॉफी हाउस असल्यामुळे कॉफी यायला  उशीर होता. आमच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी सुरु झाल्या. गोष्टी रंगात आल्या होत्या आणि माझ्या डोक्यात एकदम विचार आला कि आज बाप्याला विचारू त्याच्या लग्न न करण्याचे कारण. मी मौका पाहिला आणि त्याला सरळ सरळ विचारलेच.त्यावर आढावे घेत तो टाळण्याचा प्रयत्न करू लागला. "काय आपल्या नशिबातच नाही रे ? " परंतु मी हि त्याचा पिच्छा पुरवला, त्यावर जरासा चिडूनच म्हणाला , " अरे प्रत्येक गोष्टीला नशीब लागत. "कभी किसीको मुकम्मल जहां नही मिलता, कही जमीन तो कही आसमां नही मिलता ." अरे आम्हाला तर ना जमिन ना आसमान !

त्यावर मी त्याला म्हणालो ,"अरे तू तर पुष्कळ मुली पाहिल्यास ना ? मग एकही पसंत आली नाही?
बाप्या म्हणाला, " जाऊदे रे असतात एकेकाचे नशिबाचे भोग"

मी म्हणालो, " बाप्या, नशिबाच्या काय गोष्टी करतो, तूच तर सगळ्यांना नाकारलं. एकही धड वाटली नाही तुला?"

आता बाप्या मात्र चिडला म्हणाला ," नशीब नाही तर काय रे?,  " I was in search of perfect wife !"

मी म्हणालो, " मग तुला कुठेच मिळाली नाही".

बाप्या, " तेच तर म्हणतोय, नशिबाचे भोग. एकही मिळाली नाही जिला मी परफेक्ट म्हणू "

मी, " एकही नाही ?" अरे तुझी एव्हढी भ्रमंती चालू असते कुठेच दिसली नाही.?

 बाप्या, " अरे एकदा मिळाली होती" 

"मग कुठे माशी शिंकली"

अरे, इटलीची होती ( याला इटलीचीच सापडली, भारतात कोणी नव्हतीच वाटत ) मी तिला मागणी हि घातली. तीही माझाशी पुष्कळ वेळ बोलली. व काय म्हणाली ठाऊक आहे का तुला?

मी म्हणालो, " मला कसं माहित असेल?"

अरे, तीने नकार दिला आणि  म्हणाली कि I am in search of perfect husband .

मी म्हणालो  बाप्या," तू आम्हाला नेहमी कबीरदास जिचा  दोहा सांगतोस. आज मलाच तुला सांगावा लागतोय.

कबीरदास म्हणतात,  बुरा जो देखन मै चला बुरा ना मिलिया कोय,
                                 जो मन खोजा आपणा मुझसे बुरा ना कोय ||

बाप्या perfect  च्या शोधात होता. तो तरी perfect  होता का? असच प्रत्येकाच असतं. आपण दुसऱ्याचे दोष शोधत असतो त्यावर चर्चा करत असतो परंतु त्याच वेळेला आपल्याकडेही चार बोटे वळलेली असतात याकडे दुर्लक्षच केलं जातं.
यातही आपला अहंकारच  दुसऱ्याला दोष देण्यास तत्पर असतो. अस म्हणतात कि फोर्डने ज्यावेळेस नवीन गाडी काढली होती तेव्हा त्याला रिव्हर्स  गेअर नव्हता. गाडी मागे वळवण्यास खूपच त्रास जायचा. मग रिव्हर्स गेअर्स आलेत. आपणही या रिव्हर्स गेअर चा उपयोग करा आणि आतला प्रवास सुरु करा. आपल्या मनाला टटोला, लक्षात येईल कि आपल्या इतक या जगात वाईट कोणीच नाही.

गालिब सुद्धा म्हणतोच ना,
उम्रभर 'गालिब'  यही भूल करता रहा,
धूल चहरे पे थी और आइना साफ करता रहा |

असच होत असतं ना? आपल्याच चेहऱ्यावर धुळ असते आणि आपण आरसा साफ करत बसतो. आरसा साफ करता करता आयुष्य निघून जातं. कोणाच्या हे पटकन लक्षात  येत तर कोणाच्या उशिराने. एखाद्याच्या तर लक्षातच  येत नाही अगदी आयुष्य संपेपर्यंत. ज्याच्या लक्षात येत तो गालिब होतो नाहीतर कबीर.