Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Thursday, August 7, 2014

0 शायरीच्या दालनात ३


urdu shayri
जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याच्या कर्मप्रधान मार्गाकडे नेणारा हा विचार आहे. त्याचां हा शेर ख-या अर्थाने पथप्रदर्शक आहे, दिशादर्शक आहे ह्यात वाद नाही.

साहीर होशियारपुरी जीवनातल्या सा-या नकारात्मक बाबींनी क्षुब्ध होतात, म्हणतात –

उम्रभर रेंगते रहनेकी सजा है जीना
एक-दो दिन कि अजियत१ हो तो कोई सह लें I
(१.तक़लिफ़ )

‘साहीर’ साहेब म्हणतात कि सा-या आयुष्य निराश, निर्जीव, संथ, अन दिशाहीन घालवण्यापेक्षा, एक असा क्षण जो आत्म्याला बळ देईल, ताकत देईल, परिस्तितीशी झगडण्यासाठी आत्मिक हिम्मत देईल, तेच खरं जीवन! तोच क्षण महत्वाचा, उरलेल्या सगळ्या आयुष्यावरून ओवाळून टाकावा असा!

उम्र भर रेंगते रहने से तो बेहतर है,
एक लमहा जो तेरी रूह में वुसअत भर दे।
-'साहिर' लुधियानवी

1.वुसअत - (i) शक्ति, ताकत, सामर्थ्य (ii) उदारता (iii) विस्तार

पुनर्जन्माची संकल्पना तशी आम्हा भारतीयांना नवी नाही. पुर्नजन्म कां ह्या प्रश्नाची उत्तरे तुम्हीही मिळविली असतीलच. खालील शेरमधील पुनर्जन्माबद्दलचा विचार पटतो कां बघा -

है कूछ तो खराबियां मेरी तामिर१ में जरूर
सौ मर्तबा बनाकर मिटाया गया हुं मैं I
(१.बनाने मे)

आपल्या व्यक्तिमत्वातील असंख्य दोष दूर करण्यासाठी, शुद्धीकरणासाठी, परिपूर्णतेसाठी त्या जगन्नियंत्याने मला शेकडो वेळा घडवले असावे, असे ह्या शायराला म्हणावेसे वाटते. वेगळ्या शब्दात हा शायर मानव सदोष असल्याचे मान्य तर करीत नाही नां? शायराला असेही म्हणावेसे वाटत असावे कि आपण आधीच हे मानले अन दोष निवारणाचा सतत प्रयत्न केला तर, देवाला पुनर्निर्मितीचा त्रास घ्यावा लागणार नाही. ‘नराचा होण्या नारायण’ किवा ‘मोक्ष’ ह्या संकल्पनाच्या जवळ पोहोचणारी हि विचारधारा आहे.

उर्दूचे महान कवी, इक़्बाल मात्र त्या जन्मदात्या अल्लालाच विचारतात कि तुझ्या घरून ह्या नंदनवनात पाठवताना तू मला मनसोक्त फिरून येण्याची सूचना केली होतीस अन माझे फिरणे अजून बाकी आहे, अपूर्ण आहे म्हणून ते पूर्ण होईस्तव थांब. इक़्बाल यांच्या ह्या शेरमध्ये हा जगावेगळा ‘हौसला’ प्रतिबिंबित होतो –

बाग-ए-बहिश्त से मुझे हुक्म-ए-सफर दिया था क्यों
कर-ए-जहां दाराज है अब मेरा इंतिजार कर.

पण हे फार कमी जनानां शक्य होते. ते ‘सारे प्रवासी घडीचे’, ‘घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा’ चे बळी ठरतात, आपल्या लक्ष्यापासून क्षणा-क्षणाला दूर-दूर जातात, अन निष्फळता साहजिकच माणसाच्या पुढ्यात नैराश्य आणून ठेवते. जीवनात निराशा पदरी पडू नये म्हणून –

जिंदगी आस का सहरा१ बने तो फिर उसमे,
कुछ आरजुओंके जुराब२ भी रख  दो I
(१.वाळवंट २.मृगजळ)

दोस्तों, ‘जिंदगी’ पर क्या कुछ मश्विरा शायरोकी कलम से मिलता है?

मागे 
urdu shayari

प्रकाश पटवर्धन

No comments: