Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Thursday, February 11, 2016

1 अंधेरे उजाले सुहाते रहे हैं


......
अंधेरे उजाले सुहाते रहे हैं 
दिलोंको दिलोमें बसाते रहे हैं I
*
मुहब्बत जताते सताते रहे हैं  
हमें प्यार वो भी सिखाते रहे हैं I
*
दिया वो बुझाकर सरे आम प्यारे
हटाकर पर्दा, मुस्कुराते रहे हैं I
*
सपन वो हमें भी दिखाते दिखाते
वहीं खो गये यूं कि सोते रहे हैं I 
*
मिलें जब हमें आमने सामने वो
नजर को झुकाकर बुलाते रहे हैं I
*
मिला साथ उन का भलाई जो' समझे
हमें वो बेलन से डराते रहे हैं I

               -    प्रकाश पटवर्धन,  

0 जिंदगी अब बोझ क्यों बनने लगी है





                   ***
जिंदगी अब बोझ क्यों बनने लगी है 
याद उन की क्यों मुझे छलने लगी है I 
*
रातरानी सी महक खिलने लगी है 
वो निकल कर इस तरफ बढने लगी है I 
*
भूल जाऊं काश मैं उन को खुशी से
याद दिल में तीर सी चुभने लगी है I 
*
क्या करें सारे भरोसे मिट रहे तो
धांदली यारो हमें छलने लगी हैI
*
दे रहे है स्वप्न अच्छे दिन मिलेंगे
उन बढे दामों से' जाँ डरने लगी है I
*
बात खाने या खिलाने की नहीं अब
रोक खाने पे भला लगने लगी है I
*
तोडकर वो दिल हमारा जा रही यूं
रुह मानो जिस्म से उडने लगी है I 
         - प्रकाश पटवर्धन, पुणे.

2 सोसतांना हासणे नाहीच सोपे




सोसतांना हासणे नाहीच सोपे
वेदनांना पाळणे नाहीच सोपे I
जाणकारांच्या मुरब्बी बैठकी या
मुखवट्याला राखणे नाहीच सोपे I
ती प्रिया माझी म्हणोनी काय झाले
चेह-याला दावणे नाहीच सोपे I 
हात हाती रम्य राती चालतांना
भावनांना रोखणे नाहीच सोपे I 
मातले सारे इथे ते राजकाजी 
शांततेने राहणे नाहीच सोपे I 
शिक्षणाच्या मुक्त बाजारी इथेची 
अर्थसत्ता टाळणे नाहीच सोपे I
दुग्धगंगा वाहते नेमेच जेथे 
भेसळीला छपवणे नाहीच सोपे I
पाटबंधारे असे कां कोरडे ते
राष्ट्रवादी भोग ते नाहीच सोपे I 
ठेव ध्यानी चार बाळे फार नाही 
भक्त सांगे आचरण नाहीच सोपे I 
ईशसेवा क्रॉसखाली चालते रे
मर्म कर्मी जाणणे नाहीच सोपे I 
मी असे हो स्वच्छ म्हणतांना इथेची
डाग काळे लपविणे नाहीच सोपे I
ही गजल माझी म्हणोनी छापताना 
काव्यचोरी लपविणे नाहीच सोपे I
- प्रकाश पटवर्धन
२०४२०१५.

Monday, February 1, 2016

0 येवढा विश्वास नाही राहिला तो माणसावर



येवढा विश्वास नाही राहिला तो माणसावर 
भिंत तोडोनी म्हणे, करु या जगा शमशान सारे I

काय झाले मानवासी मानवाचा घात करतो
तो इराणी, तो इराकी, जीव घेण्या एक सारे I 

धर्म येथे आड ना ये, रंग असो कोणताही
संस्कृतीचे भान नाही, रक्त वाहो रोज सारे I

मानवाचे शौर्य सारे, एकमेकां मारणेसी
या जगाचे एक थडगेची कराया बध्द सारे I 

पाक यांची नीत कैसी, मारती भूके जनांना 
राख करणे, ध्वस्त करणे, पाकड्यांचे खेळ सारे I 

योजना कैसी तुझी आहे मला ते आकळेना 
जोडणे नाही कुठेची, तोडण्याती मग्न सारे I




        - प्रकाश पटवर्धन
        १९४२०१५  

0 क्षमता अचाट आहे, तेही अजाब आहे




क्षमता अचाट आहे, तेही अजाब आहे
स्पर्शात शब्द आहे, संवाद येथ आहे I

स्पर्शात माय आहे, स्पर्शात राय आहे
स्पर्शात नेणिवांच्या सारेच युक्त आहे I 

स्पर्शात रम्यता ती, स्पर्शात दुःख आहे
स्पर्शात या सुखाच्या सारेच लिप्त आहे I 

स्पर्शात भाव आहे, स्पर्शात ठाव आहे
स्पर्शात भव्यता ती, स्पर्शात नीच आहे I

 हा स्पर्श जीवनाचा, आविभाज्य अंग आहे 
स्पर्शाविना जगी या, अस्पर्श काय आहे !


-   प्रकाश पटवर्धन
   १५४२०१५.  

0 आज सारे आपले परकेच झाले





आज सारे आपले परकेच झाले
कोण सांगा कुणाला प्यार झाले I 

येथ सारे चिंब स्वार्थी जाहलेले
मानवाचे गोत्र त्यासी भार झाले I

मायबापा ठेवती बाहेर प्यारे
हे समाजी पापही मंजूर झालेI 

हा फुलोरा सुखवितो नेत्रास भारी
आज काट्यांचे असे ही वार झाले I 

आज दारी पाहुणे ही येत नाही 
सांत्वनी मेसेज येथे फार झाले I 

काय वर्णू येथले औदार्य देवा
वृध्द डोळे पाहुनी ते गार झाले I
 
आज श्रध्दा संपली, बाजार झाले
धर्म, प्रेषीतांचे रेटही मंजूर झाले I

हा खुला बाजार चाले दिवस राती 
येथ सारे वीर ही हो गार झाले I



-  प्रकाश पटवर्धन 

Friday, January 22, 2016

0 स्मरता जरा सुखाला, हे काय हो जहाले



स्मरता जरा सुखाला, हे काय हो जहाले
बाजार हे व्यथांचे, वरतीच काय गेले I
समजून घे खरे हे, दुःखात सुख आहे
या मानवी जगाचा, तोची सखाच आहे I
त्या मागण्याच साठी, सारेच एक झाले
ते कारखानदारां, वाईट मात्र झाले I
देऊ नको फुकाचे, घे काम, घाम गाळी
छातीवरीच कोणी, नेवू शके न बाळी I
कोणी कशास गाळी, दो बुंद आसवांचे
माझे मलाच थोडे, ऐकू कुणा कुणाचे I
ठेवू नका भरवसा, कोणी नसे कुणाचे 
स्वार्थात मग्न सारे, मागेच ते धनाचे I
सोडून शेत जागा, धांवू नकोस मागे
टोप्या खुणावती रे, संकेत ते भ्रमाचे I
टोप्याही लोकशाही, रंगात रंगलेल्या 
भांगेपरी नशेच्या, धुंदीत धुंदलेल्या I 
कैवार फार झाला, गजेंन्द्र ठार गेला 
'अरविंद' काय सांगु, 'विश्वास'घात झाला I
सुतक कुणास नाही, जो तो हिरीरी ने
दोषारोपी करती, तरीही क्रमाक्रमाने I
          -  प्रकाश पटवर्धन  

0 महकते है किताबों में अभी तक खत पुराने से

- आने :          
र  -  से
ब  -  1222  1222   1222   1222.

महकते है किताबों में अभी तक खत पुराने से  
नई दुनिया बसाने के करिश्में भी सुहाने से I
*
चिरागों को जलाए रख सदा तू बुझ नहीं पाये 
यहाँ कब तीरगी से बच सका कोई जमाने से I 
*
गुजर जाएं हजारों मुश्किलों से हम तो' क्या कहने
हमारा नाम आयेगा मुहब्बत के तराने से I
रजामंदी सहारा है हमारा जी मुहब्बत में  
बताओ ना भला वो बाज आये क्यों जमाने से I 
*
मनाना ही फसाना है जरा सोचो मुहब्बत में 
न हम मनते,  न हम फसते, पुराने जेलखाने से I

               -    प्रकाश पटवर्धन, 
4/  

0 लूट सारे ले गये वो अब शिकायत क्या करुं

का-अत  र-क्या करुं   ब- 2122 x 3 + 212.
*
लूट सारे ले गये वो अब शिकायत क्या करुं 
बंदगी लेकर भला मैं अब बगावत क्या करुं I 

राजकाजी बन चले हैं आज सारे चोर ही
साथ उनका देने' की मैं भी हिमाकत क्या करुं I 

रह गया है दूर देखो पासबाने मुल्क भी  
साथ उन के देश को लुटने की जुर्रत क्या करुं I

बदनसीबी हैं हमारी गैर के हाथों गये
हुक्मरानों की बदलती है नियामत क्या करुं I 

चाहतों या ख्वाहिशों की बात कोई क्या करे
तीरगी में साथ लेके ये कयामत क्या करुI

            -    प्रकाश पटवर्धन,
                 विश्रांतवाडी, पुणे.  

0 नया युग हम बनाना चाहते है

का - आना;   र - चाहते है  
बहर -1222 1222   122
**
नया युग हम बनाना चाहते है  
पुराने को भुनाना चाहते है I
*
सभी को साथ लाना चाहते है
नई दुनिया सजाना चाहते है I  
*
कठिन राहे अगर मंझिल तलक हो
वहीं पे आशियाना चाहते है I  
*
चलो अब आजमाये खुदी को   
दिवाने दिल जलाना चाहते है I 
*
धरा सुजला सुहानी हो तभी तो
पुरी ताकद लगाना चाहते है I 

    -    प्रकाश पटवर्धन,

Wednesday, September 16, 2015

0 राज़ उल्फत का छुपाए जायेंगे !!

राज़ उल्फत का छुपाए जायेंगे 
हम उसी को आजमाए जायेंगे I 

क्या है हस्ती, मुस्कुराए जाएगें
दर्द को भी हम मिटाए जाएंगे, I 

डर के गर हम मौन सहते जाएंगे 
टूटकर एक दिन बिखरे जाएंगे I 

देश पर जां को लुटाते जाएगें 
नाम रोशन खास करते जाएंगे I 

व्यर्थ सब हम क्यों बटोरे जाएगे
क्या है जो हम संग लेके जाएगे I 

तोडकर सब बेडियां ये जाएगे
इक नया संसार वो दे जाएगे I 

मुफ्लिसी में यूं सताये जाएंगे
एसी कमरे में सुलाये जाए I  

ये हवस तू छोड मारे जाएंगे  
कर फकीरी, सब लुटाते जाएंगे I

-  प्रकाश पटवर्धन, पुणे. 

Wednesday, September 9, 2015

0 आप को जाना था...



आप को जाना था...
आपको जाना था तो हमको बता कर जाते
मन के मंदिर में छवि अपनी बसा कर जाते I

खा़ब आंखों में मेरे यूं न सजाकर जाते  
हर तरफ़ दिल के ये टुकड़े न गिरा कर जाते I 
*  
हाल दिल का न सनम हम से छुपाकर जाते
एक बस घाव जरा दिल पे लगाकर जाते I 

हमने इक उम्र गुज़ारी है वफ़ा पाने को,
जाते जाते ही सही यार वफ़ा कर जाते I 
*  
आप हम से तो भला आंख मिलाकर जाते
साकिया हम को जरा जाम पिलाकर जाते I 

याद आती है सदा दर्द बढा़ जाता है  
यूँ सताना था तो दिल को भी मिटा कर जाते I
                          -  प्रकाश पटवर्धन, पुणे.

Saturday, June 27, 2015

0 शायरीचा गुलदस्ता भाग १५




मला उर्दू शायरीचे वेड केव्हा लागले हे निश्चित आठवत नाही. बहुदा शालेय वयातच माझा आणि उर्दू शायरीचा संबंध आला असावा. उन्हाळ्याच्या सुटीत असाच एक पुस्तक  वाचत बसलो  होतो आणि एक शेर वाचण्यात आला. उन्हाळा सुरु असल्यामुळे हवा मुळीच नव्हती. झाडाच पानही हलत नव्हत. या कडाक्याच्या उन्हात सर्वजण हवेच्या झुळूकीची वाट पाहत असत.हवेची जराशी झुळूक आली कि अगदी हायसं वाटायचं. तो शेर मी दोन तीन वेळा वाचला आणि अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. शेर असा होता,

हवा चले ना चले लोग इंतजार में है ,
खुली हुवी है अभी, खिडकिया मकानो की.            ----  कैसरुल जाफरी

मला वाटले की लोकांनी घराच्या खिडक्या उघडून ठेवल्या आहेत. कारण गर्मी खुप आहे. हवा येवो अथवा ना येवो परन्तु लोकांची प्रतीक्षा चालूच आहे. आणि वरवर पाहता मला वाटलं की कविने याच परिस्थितीचे वर्णन केलेलं असावं.

पुढे मोठा झालो विचारांची खोली वाढली आणि लक्षात आलं की या दोन ओळींच्या मध्ये खूप काही दडलं आहे. मग हि हवा कसली तर हि हवा आहे बेहतर जीवनाची, सच्चाई ची, बेहतर समाजाची, खुशाली ची अगदी सध्याच्या BJP च्या " अच्चे दिन आनेवाले है" या घोषणेत दडलेल्या विचारांची. आता 'खिडकिया मकानोकी' याचा संकेत कुठे आहे, तर तो ' रुधयाची कवाडे,' बुद्धीची कवाडे ' याकडे  आहे.

म्हणजेच 'अच्चे दिन आनेवाले है' या प्रतीक्षेत लोकं आपल्या हृदयाची कवाडे उघडून बसली आहेत. रामराज्य यईल, सर्वदूर न्यायाचा बोलबाला असेल, समाजात असलेली श्रीमंत गरीब यांच्या तील दरी नष्ट होईल, समाजातील असमानातेला तिलांजली दिली जाईल. जगात
खुशाली नांदेल. अशा हवेच्या प्रतीक्षेत माणसे आपल्या घराची दारे, खिडक्या  उघडून बसले आहेत. आशा आहे या जगाच नंदनवन होण्याची , उम्मीद अजून बरकरार आहे. अशी शायरी वाचली कि वाटतं मातीच्या इवल्याश्या भांड्यात जणू समुद्र भरून ठेवला आहे.

उर्दू शायरी मध्ये अथवा कोणत्याही कवितेत संकेत कोठे आहे हे कळणे महत्वाचे असते. शायर आपल्याला कोणत्या दिशेने नेत आहे याची जाण यावी लागते. 


 दत्तात्रय पटवर्धन

Tuesday, June 16, 2015

0 शायरीचा गुलदस्ता भाग १४



भाग ११ मध्ये आपण पाहिले कि चिराग हा शब्द कसा वेगवेगळ्या संकेताने वापरला जातो.आज एका घटनेमुळे एका उर्दू शेर ची आठवण झाली. घटना अशी कि दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्र तोमर यांना पोलिसांनी फर्जी डिग्री असल्याबाबत अटक केली.कायदे मंत्री याची वकिलीची डिग्री खोटी हा केव्हडा मोठा अपराध. परंतु या अटकेचे समर्थन करण्या ऐवजी  अरविंद केसरीवाल यांनी या अटकेची निंदा करण्यास सुरवात केली. केद्र सरकार वर आरोप ठेवण्यात आलेत. आप पार्टीला बदनाम करण्यासाठी भाजप ची हि कुटनीती आहे. अरविंद केसरीवाल  यांनी आप पार्टीची स्थापना केली होती ती भ्रष्टाचार निर्मुलन करण्यासाठी. आणि त्याच्या कायदे मंत्रीच खोट्या डिग्री बाबत जेल मध्ये गेला आणि आप पार्टीच्या या विचारधारेला काळिमा फासला. जितेंद्र तोमर आणि समर्थन करणारे सर्वच आप पार्टीचे वंशाचे दिवे.

शायर म्हणतो,

दिल के फफोले जल उठे सीने के दाग़ से
इस घरको आग लग गई, घरके चराग से.               अज्ञात

आधीच हृदयात असलेले फ़फ़ोले त्याची आग असह्य. त्यात असा डाग, मग त्या आगीची तीव्रता अधिक भडकणार नाही तर काय? वंशाच्या दिव्यानेच घराला आग लावली काय करणार?

येथे चिराग या शब्दाचा अर्थ "वंशाचा दिवा" असा होतो.




चिराग या शब्दाचा उपयोग केलेला असाच एक शेर मला आठवतो,

शब-ए-इंतजार की कश्मकश में न पूछ कैसे सहर हुई,
कभी इक चराग जला दिया, कभी इक चराग बुझा दिया.                 मजरूह

येथे चिराग या शब्दाचा सांकेतिक अर्थ  स्वप्नांचा चिराग, आशेचा चिराग, असा आहे.

शब-ए-इंतजार च्या कश्मकश ( उलझन) मध्ये सकाळ  कशी झाली  म्हणून काय सांगू!  कधी एक दिवा  प्रज्वलित केला तर कधी एक दिवा विझवला. म्हणजेच  एक स्वप्न पाहिलं ते बाजूला सारलं मग दुसरं स्वप्न पाहिलं तेही बाजूला केलं. मग तिसर, चौथ अशी स्वप्नांची श्रुखलाच निर्माण झाली आणि सकाळ केव्हा झाली आम्हाला कळलंच नाही.
ज्यावेळेला आयुष्यात काही काळासाठी अंधकार निर्माण  होतो त्यावेळेस स्वप्न फार महत्वाची ठरतात. It acts as buffer between you and the situation.


दत्तात्रय पटवर्धन


Thursday, June 11, 2015

0 शायरीचा गुलदस्ता भाग १३



जगात काही माणसे आभाळा एव्हडं काम करून जातात. सर्वच माणसे इच्छा असून देखील भव्य दिव्य काम करू शकत नाहीत. परंतु काही माणसे रस्त्यातून जाताना रस्त्यातील काटे उचलण्याचे काम करतात जेणे करून त्यांच्या मागून येणाऱ्यांना त्या काट्यांचा त्रास होऊ नये. व अशा लोकांना काही काटे कमी करण्याच श्रेय द्याव लागत. अशा रीतीने प्रत्येक व्यक्ती काहीना काही योग्य कार्य करून या जगाला सुंदर करीत असते.

साहीर लुधियानवी यांचा एक शेर याच गोष्टीचा उहापोह करतो,

माना की इस जमीं को न गुलजार कर सके,
कुछ ख्वार कम तो कर गए, गुजरे जिधर से हम.

साहिरजी म्हणतात, "आम्ही या जगाच नंदनवन तर करू शकलो नाही परंतु ज्या ज्या मार्गावरून आम्ही प्रवास केला त्या मार्गातील काही काटे कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच केला." कुछ ख्वार, येथे हाही अहंकार बाळगलेला नाही कि सर्व काटे दूर केले. आम्हाला शक्य होते तितके केले.


सर्व प्रथम ज्या व्यक्तीने आपल्या घराबाहेर रात्रीच्या वेळेस दिवा लावण्यास सुरवात केली तेव्हा त्या व्यक्तीची सर्वांनी थट्टा केली. त्याच मार्गावरून जाताना  ज्या ज्या लोकांना त्या दिव्याच्या उजेडामुळे मार्गक्रमण करण्यास मदत झाली त्यांनीही आपल्या घराबाहेर दिवा लावण्यास सुरुवात केली आणि येथूनच स्ट्रीट लाईट ची कल्पना जगासमोर आली. आज त्या व्यक्तीच्या या छोट्याश्या कृत्यामुळे आम्हाला स्ट्रीट लाईट मिळाले. हे जग सुंदर होण्यास मदत झाली. असेच रात्यावरून काटे वेचत चला एक दिवस नक्कीच या जगाच नंदनवन होईल.जगाच नंदनवन करण्यात आपलाही खारीचा वाटा असावा.

जां निसार खां अख्तर यांचाहि असाच एक शेर आहे.

जिंदगी ये तो  नहीं तुमको सवारा ही न हो,
कुछ न कुछ कर्ज तेरा हमने उतारा ही न हो.

मान्य आहे कि  निसर्गाने आम्हाला भरभरुन दिलेलं आहे.  या जीवनाचे आमच्या वर खूप उपकार आहेत. परंतु हे जीवन सुंदर करण्यास आम्ही काहीच केले नाही असे नाही. हे उपकार, कर्ज फेडण्यासाठी आम्हीही काहीना काही केलेलं आहे. आमचा खारीचा वाटा नक्कीच थोडं कर्ज उतरवण्याच काम करीत आहे.

दत्तात्रय पटवर्धन.

Tuesday, June 2, 2015

0 शायरीचा गुलदस्ता भाग 12



मैत्री म्हटली कि ती मैत्री निभावण्याच्या आणाभाका , त्या शपथा, आठवतात. अनेक वेळा काहीना काही कारणावरून दिलेला शब्द  निभावता येत नाही  आणि मैत्री तुटते. या आणाभाका ज्याला उर्दूत 'वफा' म्हणतात आणि त्याविरुद्ध म्हणजे 'जफा'.
वफा आणि जफा या दोन शब्दांचा उपयोग  उर्दू शायरीत अनेक वेळा केलेला आढळतो. प्रेमावर जितकी शायरी आहे तितकीच शायरी वफा आणि  जफा वर आहे.

आता हाच शेर पहा,

जफ़ा के जिक्र पे तुम क्यो  संभल के बैठ गए,
तुम्हारी बात नहीं, बात है ज़माने की .                                          मजरूह सुल्तानपुरी

असे म्हणतात की truth should be sugar coated,  कारण सत्य गिळण्यास कठीण असतं. येथे शायर एक sugar coated pill आपल्याशी जफा (शपथेचा भंग करणाऱ्याला ) करणाऱ्याला देत आहे. तो म्हणतो की जेव्हा जफा ची ( जुलुमाची, शपथ तोडल्याची ) चर्चा सुरु झाली त्यावेळेस तू स्वतःला सावरून बसलीस. कारण तुला भीती होती की कुठे यात तुझंही नाव तर येणार नाहीना? तुलाही माहित आहे  की घेतलेल्या शपथेचा भंग कोणी केला. तुझी ती दयनीय स्थिती बघवली नाही व मी तुला इशारा केला की आंम्ही तुझी  गोष्ट करीत नाहीत,  be comfortable, be relaxed, आम्ही तर जगाची गोष्ट  करीत आहोत की हे जग किती जुलमी आहे. किती सौम्य रीतीने शायर तिच्या तोडलेल्या शपथेची कल्पना तिला करून देत आहे.

रंज तो ये है की वो अहले-वफ़ा टूट गया,
बेवफा कोइ भी हो, तुम न सही, हम ही सही.                              डॉ राही मासूम रझा

मैत्रीत केलेल्या आणाभाका अनेक वेळा तुटतात, त्याला नक्कीच कोणी न कोणी जवाबदार असतो. शायर म्हणतो की आपली मैत्री तुटली याच मला दु:ख आहे. आपण मैत्री निभाऊ शकलो नाही हीच जीवनाची tragedy  आहे. मग हि मैत्री कोणामुळे तुटली हा भाग दुय्यम आहे. तुझ्यामुळे नाही तर मान्य आहे की माझ्यामुळेच हे झाले. या वर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. आपली मैत्री तुटली हीच एक गोष्ट सत्य आही आणि त्याचच मला दु:ख आहे.

मेहबूब से भी हमने निभाई बराबरी,
वां लुत्फ़ कम  हुवा, तो यहाँ प्यार कम हुवा.                             मोमिन खां मोमिन

लुत्फ़ : आनंद, मजा , मिठास

शायर म्हणतो की मेहबूब बरोबर आम्ही बरोबरी निभावली. तिकडे लुत्फ़ कमी झाला म्हणजेच तिच्यातल सौंदर्य कमी झालं , तिच्या बरोबर बसण्यात आणि गप्पा मारण्यातला आनंद कमी झाला, तिच्यातली मिठास कमी झाली म्हणून आमच् प्रेमही कमी झालं. असा अर्थ आपण लुत्फ़ चा डिक्शनरी अर्थ घेतल्यास काढू. इथेही शायर एक sugar coated pill देत आहे. येथे लुत्फ अर्थ आहे वफाई कडे. तो म्हणतो की तिकडे वफा कमी झाली आणि त्याच प्रमाणात इकडे प्रेमही कमी झाले. अशा रीतीने आम्ही बरोबरी निभावून नेली. अप्रत्यक्षरित्या शायर दोष आपल्या कडे ठेवून तिला तिच्या बेवफाईची  जाणीव करून देत आहे.


दत्तात्रय पटवर्धन

Sunday, May 31, 2015

1 शायरीचा गुलदस्ता भाग 11


उर्दू शायरी मध्ये 'चिराग' शब्दाचा प्रयोग अनेकदा केलेला आपणाला आढळतो. चिराग या शब्दाचा अर्थ 'दिवा' असा होतो.परंतु चिराग हा शब्द वेगवेगळ्या संकेताने अनेक वेळा वापरलेला दिसतो. असाच एक शेर पहा,

शहर के अंधेरे को इक चिराग काफी है.
सौ  चराग जलते है इक चराग जलनेसे.                         अज्ञात

समाजात जो अंधार पसरलेला आहे, ज्या कुप्रथा रूढ झालेल्या आहेत त्या दूर करण्यासाठी एका दिव्याची गरज असते. येथे 'चिराग' हा शब्द आदर्श, सभ्य, संस्कारी माणसाच प्रतिक आहे. एक झिजस, एक राम, एक महात्मा गांधी, एक सावरकर, एक भगत सिंग, एक टिळक,  एक बाबासाहेब आंबेडकर, हजारो लाखो लोकांना जागृत करतात. अन्याया विरुद्ध जुलमी राजवटी विरुद्ध, उठाव करण्यास प्रवृत्त करतात.  अशी एकच व्यक्ती समाजातील  अंधकार दूर करण्यास समर्थ असते कारण तोच दिवा हजारो दिव्यांना प्रज्वलित करतो म्हणजेच एक व्यक्ती हजारो लाखो लोकांना कार्य सिद्धीस नेण्यास प्रवृत्त करत असते.

हथेलियोने  बचाया बहुत चरागों को,
मगर हवा भी अजब जाविए बदलती है.                           अज्ञात

जाविए : कोण, angles

जेव्हा हवा सुरु होते तेव्हा दिवा विझु नए म्हणून आपण त्या दिव्याला हाताने झाकतो. येथे 'चराग' म्हणजे एखादा उत्कट विचार, संस्कार, प्रथा, किव्वा सभ्यता. 'हथेली' हे सभ्य माणसाच प्रतिक. म्हणजेच सभ्य माणसांनी हे संस्कार, ही सभ्यता समाजात  टिकून राहण्यासाठी कसोशिने प्रयत्न केलेत. परंतु "हवा भी अजब जाविये बदलती है."   परंतु जुलुमी हवा वेगवेगळ्या दिशेने या दिव्यावर आक्रमण करून हा दिवा विझवण्याचा प्रयत्न करत असते.

दत्तात्रय पटवर्धन

Wednesday, May 13, 2015

0 बुद्धिबळाचा इतिहास : भाग ७

पर्शिया मध्ये या खेळात काही बदल करण्यात आलेत. आपणाकडे जो 'गज' होता तो पाच घरात चालत असे.
एक समोरील घरात, हे सोंडेचे प्रतिक होते. आणि एक घर कर्ण रेषेत, अशी चार घरं, जी चार पायांचे प्रतिक होते.
परंतु पर्शिअन सैन्यात गज म्हणजेच हत्ती चे महत्व नव्हते म्हणून त्यांनी गज ( bishop ) चे समोरील घरात
जाणे बंद केले व त्या ऐवजी कर्ण रेषेत एका ऐवजी दोन खरात जाण्याचे बळ दिले. पर्शिअत या खेळावर
भारतापेक्षा  जास्त विचार करण्यात आला तसाच त्यांनी एक महत्वाचा बदल केला तो हा कि जर राजावर जोर
असेल तर "शाह" म्हणून घोषणा करायची. हाच शब्दप्रयोग आपण सध्या 'शह' म्हणून उदगारतो. हीच घोषणा
पुढे इंग्रजीत 'चेक' म्हणून प्रचारात आली. अशी घोषणा करण्या मगच उद्देश हा कि शत्रुपक्षाला सचेत करणे कि
तुझा राजा धोक्यात आहे जेणे करून त्याचे लक्ष नसेल तर राजा मरेल आणि डाव आकस्मित पणे संपेल.पुढे
'check  mate ' सारखे शब्द प्रयोगात आले.

जेव्हा राजा कोणत्याही घरात सरकू शकत नाही,म्हणजेच असे कोणतेही घर राजा साठी उपलब्ध नसते जेथे
ते घर शत्रू पक्षाच्या जोराविना आहे. अशा परिस्थितीस पर्शिअन लोकं 'मानद'असे महानत. याचा अर्थ गोंधळलेला यातूनच पुढे 'mate ' हा शब्द प्रचारात आला. म्हणूनच 'mate ' चा अर्थे 'राजा मेला' असा न होता 'गोंधळलेला राजा' असा होतो.

पर्शिआत 'चतुरंग' चा 'झतरंग' असा अपभ्रंश झाला. राजाचे नामकरण 'शाह' म्हणून करण्यात आले. चातुरांगातला 'मंत्री' हा 'फर्झीन' झाला . घोडा अस्प , बिशप (elephant ) पिल तर foot soldier हा पियादा म्हणून नावारूपास आला. फर्झीन या
शब्दाचा उपयोग संत कबीर तसेच संत रहिम यांच्याही डोह्यांत सापडतो,
उदा. बडा बढाई न करे, छोटा बहु इतराय
        ज्यो प्यादया फरझी भया , तेढा तेढा जाय || ( कबीर )

रहिमान सिधी चाल सो प्यादा होत वजीर
फरजी साह न हुई सके, गती तेढी तासीर. || ( रहीम )

Monday, May 4, 2015

0 शायरीचा गुलदस्ता भाग १०.

निदा फाजली, एक चालत बोलत अंजुमन ,   यांची हि गज़ल आहे. 
प्रत्येक गज़ल हि काहीना काही आशय  घेऊन येते. प्रत्येक शेर वेगवगळ्या विषयाशी ओळख करून देतो.
गजल वाचल्यावर प्रत्येकाला असे वाटते की गजल ही त्याच्या  साठीच लिहिलेली आहे.

कही छत थी, दिवारो-दर थे कही, मिला मुझको घर का पता देरसे,
दिया तो बहुत जिन्दगिने मुझे, मगर जो दिया वो दिया देरसे.

घराच छत  कुठे तर दरवाजे-भिंती कुठे भलतीकडेच असल्यामुळे मला, माझ आपलं पूर्ण  घर मिळायला उशीर झाला.
तस पाहिलं तर मला या जीवनात खूप काही मिळाल. प्रत्येकाला मिळत असतं. परंतु मला उशिरा मिळाल .
वेळ निघून गेली होती आता त्या मिळालेल्याची काहीच किंमत माझ्या जीवनात नव्हती,
 त्याची आवश्यक्यता हि नव्हती.

हुवा न कोई काम मामुलसे, गुजरे शबोरोज कुछ इस तरह
कभी चांद चमका गलत वक्तपर, कभी घरमें सुरज उगा देरसे.

काय कहाणी सांगू जीवनाची? प्रत्येक कामात अडचणी. कोणतच  काम सहजतेने झाले नाही.
आयुष्यातील दिवस रात्र (शबोरोज) असे गेले कि कधीच वेळेवर चंद्र उगवला नाही तर
सूर्य नेहमीच उशिरा उगवला.

ये इत्तेफ़ाक़त  का खेल है, यही है जुदाई, यही मेल है,
मै मुडमुडके देखा किया दूर तक, बनी वो खामोशी, सदा देरसे |

जीवनात घडणार्या गोष्टी या योगायोगाच्या असतात. मग एखाद्याची भेट काय आणि ताटातूट काय?
परंतु मी मागे वळून वळून क्षितिजा पर्यंत पाहत राहिलो कि कोणीतरी साद ( आवाज ) देईल. आम्हाला बोलावेल.
परंतु दर वेळेला एक भीषण शांतताच नजरेस पडली. आणि आसाच एक दिवस आवाज आला परंतु त्यावेळेस
उशीर झालेला होता.

कही रुक गये राह में बेसबब, कही वक्तसे पहले घर आई शब,
हुए बंद दरवाजे खुलखुलके सब, जहा भी गया मै - गया देरसे. |

आता या सर्वासाठी केव्हा केव्हा माझीच चूक होती ना. कारण नसताना आम्ही रस्त्यात थांबलो, तर कधी निघायच्या  वेळीच
अंधारून आलं. अनेक दरवाजे माझ्या साठी उघडले गेले, आणि बंद झाले. कारण मी प्रत्येक ठिकाणी उशीराच  पोहोचलो.

सजा दिनभि रोशन, हुई रातभी, भरे जाम, लहरी बरसात भी,
रहे साथ कुछ ऐसे हालत भी , जो होना था जल्दी हुआ देरसे ]

अस नाही कि आमच्या जीवनात बहार हि कधीच आली नाही. चमचमती रात्र कधीच आली नाही. पावसाळ्याचा आनंदही लुटला नाही, प्याले भरभरून रिकामे  झाले नाहीत. अस कही नाही. हे सर्व कही झाल, परंतु अशा वेळी झाल कि ज्या वेळी व्हायला हव होतं तेव्हा झाल नाही. .


दत्तात्रय पटवर्धन

Thursday, April 30, 2015

0 बुद्धिबळाचा इतिहास भाग 6

सहाव्या शतकात चतुरंग हा खेळ पर्शियात आला. येथे गोट्यांची नावे पर्शियन भाषेत
अथवा उच्चाराप्रमाणे ठेवली गेली. पर्शियन भाषेत, 'चतुरंग' चे 'झतरंग' असे
झाले. अरबी मध्ये 'शतरंज' , मलाई मध्ये 'झीतोर' तर मंगोल मध्ये 'शतर'
अशी नावे बदलली. पर्शियांस या खेळात जास्त बदल करू शकले नाहीत
कारण अरबांनी याच शतकात येथे हल्ले केले आणि आपले राज्य स्थापन केले.
पर्शिअन साहित्यात 'कार्नामक'  नामक ग्रंथात, पहलवी भाषेत, या खेळाची माहिती मिळते.
पर्शियात 'फिर्दीसी' नावाचा कवी क ९५५ - १०१० या काळात होऊन गेला. त्याने 'शाह्नामा'
हे महाकाव्य लिहिले. या महाकाव्यात या खेळाविषयी विस्तृत माहिती मिळते.
याच महाकाव्यात एक दुसरी कथा बुद्धिबळ शोधाची दिलेली आहे.
एक राणी अत्यंत चिंतीत होती. तिची दोन सावत्र मुले, 'तल्हन्द' आणि 'गव्ह' यांच्यातील
 वैमनस्य हे तिच्या चिंतेचे कारण होते. दोघे सावत्र भाऊ असल्यामुळे सत्तेचा
खरा अधिकारी कोण यावरून त्याच्यात वैमनस्य निर्माण झालेले. एका युद्ध प्रसंगी राणीला
माहिती मिळते कि, तल्हन्द हा युद्धात मारला गेला. तिला गव्ह वर शंका येते.
शेवटी तिचा गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने तिच्या दरबारातील गुरु बुद्धिबळ पाटाची
निर्मिती करतात व त्यावरून राणीला दाखवतात कि युद्ध भूमीवर तल्हन्द हा कसा
युद्धाच्या थकव्यामुळे मेला न कि त्याच्या भावाच्या हाताने. हे स्पष्ट करीत असताना
 'shah mat ' (शाह मात ) या पर्सिअन शब्दाचा उपयोग केलेला आहे. या शब्दाचा अर्थ
' the king is dumbfounded or exhausted ' असा होतो. परंतु 'मात' या शब्दाचा अर्थ आपण
'राजाचा मृत्यू' ( The king is died ) असा घेतो. याच कथेतील या शब्दप्रयोगावरून
आपण 'शह आणि  मात' असा शब्दप्रयोग करू लागलो. पुढे हाच शब्द इंग्रजीत 'check mate'
म्हणून प्रचलित झाला. या पर्शिअन काळातील बुद्धिबळ सोंगट्या आज अस्तित्वात नाहीत
परंतु भारतीय आणि पर्शिअन लोकांची खेळतानाची चित्रे अशा अनेक पुस्तकांत तसेच महाकाव्यात
दिलेले आहेत. त्यावरून या खेळाचे कल्पना येते. 



दत्तात्रय पटवर्धन