Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.
Showing posts with label kabir. Show all posts
Showing posts with label kabir. Show all posts

Wednesday, May 13, 2015

0 बुद्धिबळाचा इतिहास : भाग ७

पर्शिया मध्ये या खेळात काही बदल करण्यात आलेत. आपणाकडे जो 'गज' होता तो पाच घरात चालत असे.
एक समोरील घरात, हे सोंडेचे प्रतिक होते. आणि एक घर कर्ण रेषेत, अशी चार घरं, जी चार पायांचे प्रतिक होते.
परंतु पर्शिअन सैन्यात गज म्हणजेच हत्ती चे महत्व नव्हते म्हणून त्यांनी गज ( bishop ) चे समोरील घरात
जाणे बंद केले व त्या ऐवजी कर्ण रेषेत एका ऐवजी दोन खरात जाण्याचे बळ दिले. पर्शिअत या खेळावर
भारतापेक्षा  जास्त विचार करण्यात आला तसाच त्यांनी एक महत्वाचा बदल केला तो हा कि जर राजावर जोर
असेल तर "शाह" म्हणून घोषणा करायची. हाच शब्दप्रयोग आपण सध्या 'शह' म्हणून उदगारतो. हीच घोषणा
पुढे इंग्रजीत 'चेक' म्हणून प्रचारात आली. अशी घोषणा करण्या मगच उद्देश हा कि शत्रुपक्षाला सचेत करणे कि
तुझा राजा धोक्यात आहे जेणे करून त्याचे लक्ष नसेल तर राजा मरेल आणि डाव आकस्मित पणे संपेल.पुढे
'check  mate ' सारखे शब्द प्रयोगात आले.

जेव्हा राजा कोणत्याही घरात सरकू शकत नाही,म्हणजेच असे कोणतेही घर राजा साठी उपलब्ध नसते जेथे
ते घर शत्रू पक्षाच्या जोराविना आहे. अशा परिस्थितीस पर्शिअन लोकं 'मानद'असे महानत. याचा अर्थ गोंधळलेला यातूनच पुढे 'mate ' हा शब्द प्रचारात आला. म्हणूनच 'mate ' चा अर्थे 'राजा मेला' असा न होता 'गोंधळलेला राजा' असा होतो.

पर्शिआत 'चतुरंग' चा 'झतरंग' असा अपभ्रंश झाला. राजाचे नामकरण 'शाह' म्हणून करण्यात आले. चातुरांगातला 'मंत्री' हा 'फर्झीन' झाला . घोडा अस्प , बिशप (elephant ) पिल तर foot soldier हा पियादा म्हणून नावारूपास आला. फर्झीन या
शब्दाचा उपयोग संत कबीर तसेच संत रहिम यांच्याही डोह्यांत सापडतो,
उदा. बडा बढाई न करे, छोटा बहु इतराय
        ज्यो प्यादया फरझी भया , तेढा तेढा जाय || ( कबीर )

रहिमान सिधी चाल सो प्यादा होत वजीर
फरजी साह न हुई सके, गती तेढी तासीर. || ( रहीम )

Tuesday, December 23, 2014

0 कबीराचे दोहे : भाग १६

इसाप  हा झांथस च्या घरी स्वयंपाकी होतो. त्याकाळी गुलाम ठेवले जात असतं. इसाप  हा असाच झांथस चा गुलाम होता. अत्यंत बुद्धीमानी, कमी उंचीचा व दिसायला अगदी कुरूपच. एके दिवशी झांथस कडे त्याचा मित्र येतो. झांथस इसापला म्हणाला कि आज माझा मित्र आलेला आहे त्याच्यासाठी सर्वात उत्तम पदार्थ बनवशील. जेवणाची वेळ झाली तेव्हा झांथस इसापला म्हणाला कि वाढायला सुरवात कर.. इसाप वाढायला लागतो आणि झांथस ते पाहून थक्कच होतो. काय केले असेल या इसापने? त्याने सर्व पदार्थ बोकडाच्याच जिभेचे. यावर झांथस म्हणाला कि, इसाप हे काय सर्व पदार्थ बोकडाच्याच जिभेचे? यावर इसाप म्हणाला कि, जगात जीभे एव्हडी उत्कृष्ट वस्तू दुसरी कोणतीच नाही आणि तुम्ही मला सर्वात उत्कृष्ट पदार्थ करायला सांगितले होते. झांथस  काहीच न बोलता शांत बसतो. मग रात्रीच्या भोजनासाठी सर्वात निकृष्ट पदार्थ बनवण्यास सांगतो. रात्र होते आणि दोघेजण जेवायला बसतात. पुन्हा पाहतात तो काय? पुन्हा बोकडाच्याच जीभा. यावर झांथस इसापकडे एक कटाक्ष टाकतो.   त्याची प्रष्णरूपी  नजर इसापला कळते व तो म्हणतो कि या जगतात जीभे एव्हडी वाईट गोष्ट काहीच नसेल. जीभच सर्वात निकृष्ट आहे.

बरोबर आहे कबीर दासजी म्हणतात,

कुटील वचन सबसे बुरा जासे होत न हार,
साधू वचन जल रूप है, बरसे अमृतधार.  (कबीर दास )

 
या जिभेतुन जेव्हा कटू वचन बाहेर पडतात त्यावेळेस कलह निर्माण होतो परंतु ज्यावेळेस याच जिभेतुन प्रेमाचे स्नेहाचे शब्द बाहेर पडतात तेव्हा हीच जीभ मात्र मैत्री जोडते. हि जीभच आहे जी मैत्री जोडते आणि  मैत्री तोडते. "अंधे का बेटा अंधा " हे शब्द जेव्हा या जिभेतुन पडतात तेव्हाच महाभारताच्या युद्धाची बीजे पेरली जातात. जिभेला झालेली जखम तर बरी होते परंतु जीभे मुळे झालेली जखम बरी होतं नाही.
एक संस्कृत सुभाषित सुद्धा हेच सांगते,
वाग्माधुर्यात सर्वलोकप्रियत्वम, वाक्पारुश्यात सर्वलोक अप्रियत्वम,
किंवा लोके कोकीलेनोपकार: , किंवा लोके गर्दाभेणाप्रकार: ||

मधुर बोलणारे सर्वांना  प्रिय होतात. कठोर वचनाने अप्रिय होतात. कोकिळेने जगावर असे कोणते उपकार केलेले आहेत तरी तो  सर्वांना आवडतो आणि गाढवाने  कुणाचे काय वाईट केले कि ते कोणालाच आवडत नाही. या सर्वांच एकच कारण आहे ती म्हणजे जीभ. म्हणूनच समजदार माणसे म्हणतात  "खाताना आणि बोलताना जिभेवर ताबा ठेवला पाहिजे.

 दत्तात्रय पटवर्धन

कबीराचे दोहे : भाग ७

कबीराचे दोहे : भाग ७
कबीराचे दोहे : भाग ७

कबीराचे दोहे : भाग ७

Monday, November 17, 2014

0 कबीराचे दोहे : भाग १३


मी आणि बाप्या असाच एकदा अंगणात उभे होतो. आंगण स्वच्छ झाडलेले होते एव्हढ्यात झाडाचे एक पान खाली गळून पडले. बाप्या पळत गेला आणि ते झाडाचे पान उचलून आणले आणि म्हणाला , "घरात फेविकोल आहे का?"
मी म्हणालो बाप्या, "काय विचार आहे? पान परत झाडाला चिटकावण्याचा  विचार तर करीत नाहीस ना?
बाप्या म्हणाला; "बिलकुल, तेच तर करायचे आहे."

मी म्हणालो, "अरे हे शक्य आहे का? काय हा वेडपटपणा ?"

त्यावर बाप्या म्हणाला, "ती जाहिरात पाहिली नाहीस का? तो आपल्या नावेतील खुर्च्या पाण्यात ढकलून देतो फक्त तिला आणि तिला बसण्यास जागा व्हावी म्हणून. हे कसे शक्य होते. खुर्च्यांना पाण्यातही काहीच होत नाही. कारण फेविकोल का जोड!"
अरे! दोन हत्ती लावले तरी तो जोड सुटत नाही. मग झाडाचं पान  - कीस झाड कि पत्ती - "

आतातर आजूबाजूचे लोकही जमू लागले आणि बाप्याला वेड्यात काढू लागले. परंतु बाप्या असच काहीतरी करणार.

मी गुपचूप जाउन त्याला फेविकोल आणून दिले. त्याने पान झाडाला चिटकावण्याचा प्रयत्न केला. ते काही शक्य नव्हते. प्रयत्न फसला आणि स्वताचे हसे करून घेतले. परंतु शांत बसेल तो बाप्या कसला?

मला म्हणाला, "ती लॉरेल हार्डी ची जाहिरात आठवते का? ती पिटुकली ट्यूब . फेविकोल पेक्षा पक्का जोड. आठवलं ना, फेविक्विक!!

मी काहीही न बोलता घरात पटकन पळालो आणि फेविक्विक चे ट्यूब आणून दिली. बाप्याने पुन्हा झाडाचे पान फेविक्विक्ने जोडण्याचा प्रयत्न केला. पण निष्फळ.

तेव्हढ्यात गर्दीतून एक आजोबा म्हणाले, "बाप्या, प्रयत्ने वाळूचे कण  रगडीता तेलही गळे म्हणून तू वाळू रगडत बसला तरी त्यातून  तेल काही गळणार नाही रे!

यावर सर्वजण हसू लागले.

हि काही बाप्याचीच कथा नाही. हि तर तुमची आमची सर्वांचीच कथा आहे.

कबीर दास जी म्हणतात,   दुर्लभ मानुष जन्म है,  देह न बारम्बार
                                         तरुवर ज्यो पत्ती झड़े, बहुरि न लागे डार  ||

कबीरदास जी म्हणतात, वृक्षावर जे पान असतं ते आपलं कार्य पूर्ण करून गळून पडतं. हे तर प्रत्येक जण  जाणून आहे. म्हणूनच प्रत्येक जण बाप्याला हसत होतं. कबीर जी तर त्याही पुढे जाऊन म्हणतात, हा मनुष्य देह मिळणं दुर्मिळ आहे. हा जन्म अनमोल आहे. तो पुन्हा पुन्हा मिळत नाही. हा जन्म काहीतरी चांगल, उतुंग असं करण्यात लाव . समाज सेवा कर. अनाथांचा नाथ बनण्याचा प्रयत्न कर.

Thursday, November 13, 2014

0 कबीराचे दोहे : भाग १२

आपल्या समाजात प्रवाहाच्या विरुध्द जाणाऱ्या प्रत्येक सुधारकाला अनेक संकटाना सामोरे जावे लागले आहे. मग ते ज्ञानेश्वर , तुकाराम, कबीर,मीरा , फरीद, व सोक्रेटीस व ग्यलेलिओ. या मंडळीना रूढीवादी लोकांना आपले म्हणणे /तत्वज्ञान कसे खरे आहे, सत्य आहे हे समजावताना आपला बळी द्यावा लागला आहे.
कबीरदासजी म्हणतात : -   

" साधो देखो जग बौराना,
साची कहे तो मारन धावे झुटे जग पतीयाना".
हे जग किती विचित्र आहे न!! खरं सांगितले कि मारायला धावते आणि खोट्याला जवळ करते. सत्य, वास्तविकता दाखवणाऱ्या वर रोष ओढवते तर खोट्यावर विश्वास ठेवते.जणू खऱ्याला कोणी वालीच नाही. आजच्या युगात सर्वधर्म समभाव थोड्याफार फरकाने कबीरदासजींच्या वरील उक्तीचे समर्थनाच करतो न!!
एकदा एका गुरूने आपल्या दोन शिष्यांना पाय चेपण्यास सांगितले. एकाने डावा  पाय तर दुसऱ्याने उजवा पाय दाबायला सुरवात केली. दोघेही गुरुचे सच्चे भक्त असल्यामुळे गुरुचे पाय मोठ्या आनंदाने व तन्मयतेने चेपत होते. एव्हड्यात गुरूने कूस बदलली व त्यांचा डावा पाय उजव्या पायावर पडला. उजवा पाय दाब्णाऱ्या शिष्यास आता पाय नीट चेपण्यात डाव्या पायाचा अडसर येऊ लागला म्हणून त्याने दुसऱ्या शिष्यास गुरूचा  उजवा पाय हलविण्यास सांगितले.  गुरूच्या सेवेत अडथळा येऊ नये म्हणून उजवा पाय दाबणार्या शिष्याने नकार दिला. आता दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली व ती शेगेला पोहोचण्यास वेळ लागला नाही. दोघांनी काठ्या उचलल्या. प्रथम डावा पाय दाबणार्या  शिष्याने गुरूच्या उजव्या पायावर प्रहार  केला. उत्तरादाखल उजवा पाय दाबनार्याने त्याच्या डाव्या पायावर प्रहार केला. मोठा विचित्र प्रकार होता. गुरूची सेवा डोळे झाकून केल्याने रूढीवादी व्यक्ती सारखे आंधळे झाले होते. त्यांच्या डोळ्यावर सेवेचा भ्रामक पडदा होता.
कबीरदासजी पुढे  म्हणतात, 
"हिंदू कहत है राम हमारा, मुसलमान रहेमाना,
आपस मे दोउ लडे मरत है मरम न कोई जाना"
येथे कबीराला हिंदू आणि मुसलमान हे दोन प्रतिक आहेत. ते सर्वच धर्मांना उद्देशून म्हणतात. हिंदूंचा राम अन मुसलमानांचा रहेमान -- अगदी गुरूच्या डाव्या  व उजव्या पायाप्रमाणे! यावरून दोघे वाद घालतात, भांडतात. वेळ आली तर मारतात व मरतात . दोघेही मर्म जाणून घेत नाहीत. अरे मंदिर काय व मस्जिद काय, त्या परमात्म्याचाच घर न? धर्माच मर्म सांगत सांगत सारे संत महंत आले-गेले पण आम्ही एकमेकांच्या धर्माचे वाभाडे काढण्यात धन्यता मानतो. "ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय" ,  "खरा तो  एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे" असा प्रेमाचा महिमा सारेच गाताना दिसतात पण त्याचा खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करीत नाहीत. प्रेमात समर्पण भावना असते. दुसऱ्यासाठी प्राण द्यावे लागतात, प्राण घ्यावे लागत नाहीत.
सद्य परिस्थिती पाहून तर एक उर्दू शायर मोठ्या कष्टाने म्हणतो,
"कितनी नफ़रते है तास्सुब (communal ) कि हमारे दिलो मे,
हमे थोडी समज देता तो अच्छा होता,
परिंदे तो आपस मे बैर नही करते,
खुदा तू इस दुनिया को चिडियाघर बना देता तो अच्छा होता."

नवयुगात माणूस खोल समुद्रात, उंचच उंच आकाशातच नाही तर चंद्रावर घर  करण्याच्या विचारात आहे. विज्ञानाने आम्हाला प्रगतीच्या वेगवेगळ्या स्तरावर नेले असले तरी माणसातील माणुसकी जिवंत ठेऊ शकलेला नाही. दृष्टांताच्या शब्दात सांगायचे तर ---  एक संत भर दिवसाहि हातात मशाल घेऊन फिरत असे. त्याला लोकांनी विचारले कि इतक्या भर दिवसा सूर्यप्रकाशात हातात मशाल घेऊन का फिरत आहात?  संताने उत्तर दिले, 'मी माणसाच्या शोधात आहे. मला कोठेही माणूस आढळत नाही"
घरो पे नाम थे, नामो के साथ ओहदे थे,
बहुत तलाश किया , फिरभी आदमी न मिला. 


दत्तात्रय पटवर्धन 

Thursday, October 23, 2014

4 कबीराचे दोहे : भाग ११

कबीरदासजीच्या काळात समाजावर रुढींचा जबरदस्त पगडा होता. यज्ञामध्ये हजारो प्राणी बळी दिले जात होते. विविध सुखांच्या अपेक्षेने, त्याच्या इच्छापुर्तीसाठी तसेच परमेश्वर प्राप्तीसाठी अनेक विधींचे पालन केले जात होते. या विधी अत्यंत कठोरतेने पाळल्या जात होत्या. काही तात्विकदृष्ट्या मनाला न पटणाऱ्या प्रथाहि पिढी दर पिढी स्वीकारल्या व पाळल्या जात होत्या. अशा प्रथांचा कुठून व कशा आल्या हा सुध्धा एक अध्ययनाचा विषय आहे. सर्व प्राणी जगताला  एकाच परमपित्याने निर्मिले असता त्यातील कोणा एकाचा बळी म्हणजे मारणे देवाला कसे रुचावे, तो प्रसन्न कसा होणार?.  कबीरदासजीनी ह्या प्रथांचा फोलपणा स्पष्ट करण्यासाठी म्हणून या प्रथांवर अत्यंत कडक शब्दात टीका केलेली आहे. या समाजाला कडक टीकेच्या चाबकाच्या फटकाऱ्यानी शुद्धीवर आणणारे कबीरदास हे एक क्रांतिकारी संतच होते. 

कबीरदास म्हणतात,             मोको कहा धुंडे रे बंदे , मै तो तेरे पास मे | 
                                  ना मै बकरी, ना मै भेडी, ना मै झुरि गंडास  मे|| 
                                   नही खाल मे , नही पोछ मे , ना हड्डी ना मास मे | 
                                    ना मै देवल, ना मै मस्जिद , ना  काबे- कैलाश मे || 
                                     ना तो कौनो क्रिया कर्म मे, नाही जोग बैराग मे | 
                                   खोजी होय तो तुरातही मिलीये पल भर कि तालाश मे. 
                                     मै तो सहर के भाहर , मेरी पुरी नवस मे | 
                                  कहे कबीर सुनो भाई साधो, सब सासो कि सास मे || 

       एक शेतकरी आनंदी जीवन जगात होता कारण तो समाधानी होता. एकदा एक साधू त्या शेतकऱ्याच्या घरी उतरला. गप्पा गप्पात तो साधू म्हणाला, " अरे तू एव्हडी मेहनत करतो आणि तरीही गरीबच, या जगात हिऱ्याच्या खाणी आहेत. तू जर का याचा शोध घेतला तर श्रीमंत होशील, अगदी सम्राटच.  पहाट  होताच  साधू आपल्या मार्गाने निघून  गेला. दिवसभर शेतकऱ्याला चैन नाही. त्याला फक्त हिऱ्याच्या  खाणीच दिसत होत्या. या हिऱ्याच्या खाणीनी त्याचे समाधान हिरावून घेतलं. तो अत्यंत दुख्खी झाला. एक दिवस हिऱ्याच्या खाणीच्या शोधात त्याने घर सोडले. हिऱ्यासाठी एखाद्या  भिकाऱ्यासारखा तो वणवण भटकत राहिला व अंत: राजपथावर मृतावस्तेत आढळला पण त्याला हिऱ्याची खाण काही सापडली नाही.
पुढे काही वर्षांनी तोच साधू त्या गावातून जात असताना त्या शेतकऱ्याच्या री गेला. पहातो तो तेथे दुसरेच नवे कोणी. चौकशी अंती सर्व कथा कळली. घरासमोरच्या पटांगणात काही मुले चकाकणाऱ्या दगडांशी खेळताना साधूने पहिले. मुलांकडे विचारणा केली तेव्हा कळले कि ते दगड शेताजवळून जाणाऱ्या ओढ्यातील आहेत. साधू म्हणाला, अरे हे तर हिरे आहेत. 

       परमात्मा रुपी हिरासुद्धा असाच जवळ असतो परंतु आपण त्याचा शोध बाहेरच्या विश्वात घेत भटकत (कि भरकटत) असतो. कबीरदासजी म्हणतातपरमात्मा काही  बकरी, मेंढी, देवळात, मशिदीत, चर्च, व गुरुद्वारात नसून तो आपाल्यातच आहे. तो कर्मकांडात नाही, तो जोग बैराग्यात नाही तर तो प्रत्येकाच्या श्वासात आहे. फक्त सच्या दिलाने शोधाल तर हा हिरा एका क्षणात मिळू शकतो. फक्त जरुरी आहे मान झुकविण्याची ..........  अहंकाराचा लोप होऊन विनयाचा उगम म्हणजेच परमात्म्याच्या सानिध्यात जाण्याचा मार्ग.  ध्यानात घ्या, भांड्यात पाणी तेव्हाच येते जेव्हा भांडे आपला सारा अहंकार त्यजून पाण्याकडे वाकून  विनंती करते.  मागणाऱ्या व देणाऱ्यातील हे नाते लक्षात आले कि सर्व सोपे होते. पण लक्षात कोण घेतो.,

दत्तात्रय पटवर्धन  

Saturday, August 2, 2014

0 कबीराचे दोहे : भाग १२

Kabir doha

मी आणि बाप्या रोज सकाळी फिरायला जातो. दिल्ली निवडणुका चा काळ होता. प्रत्येकाच्या तोंडावर निवडणूक हाच विषय होता. त्यातल्या त्यात अरविंद केजरीवाल  म्हणजे प्रत्येकाचा आवडता विषय.
बाप्या म्हणाला, "३०-४० वातानुकुलीत लावून थंड झालेल्या शीला दीक्षित सरकारला कोणी सत्तेवर बसवण्यास तयार नाही.  मग आता उरले आहेत दोनच पक्ष आप  आणि भाजप."

मी म्हणालो," बाप्या, यात कोणता पर्याय योग्य. भाजप तर तसा जुना पक्ष, अनुभवलेला. अरविंद केजरीवाल  नवीन आणि तडफदार, इमानदार. प्रयत्न करायला हरकत नाही. नाहीतरी आपण आजपर्यंत प्रयत्नच करीत होतो ना ?"
बाप्या म्हणाला," काहीच हरकत नाही परंतु जनता मात्र एखाद्या घडाळ्याच्या लंबाका प्रमाणे भाजप आणि आप या दोन टोकांकडे  हेलकावे घेत आहे."  "बघावे निवडणुका झाल्यावर काय होते ते!"

ठरल्या प्रमाणे निवडणुका झाल्या आणि निकाल लागला. नियमा नुसार घडाळ्याचा लंबक मध्यावर येउन थांबला. कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल नाही.

बाप्या म्हणाला, " आतातर गंमतच झाली. शीला दीक्षित सरकार तर ठरल्याप्रमाणे थंड बस्तानात जाऊन पडली. आप आणि भाजप मध्यावर येउन थाबली." "आता काय होईल ? पुन्हा निवडणुका कि अजूनकाही ----"

मी म्हणालो, " राजकारणात काय घडेल हे देवालाही सांगणे कठीण. कॉंग्रेस आप ला समर्थन देईल आणि पुन्हा  निवडणुकीचा खर्च होऊ नये म्हणून आम्ही असे करतोय,  त्याबद्दल शेखी मिरवतील." "कॉंग्रेस मात्र, ज्या केजरीवालांनी  भ्रष्टाचारी, लुच्चे लफंगे या पदव्या दिल्या, त्यांनाच खांद्यावर बसवून मुख्यमंत्री पदावर बसवतील आणि केजरीवाल  ते मान्य करतील."

पुढे घडले तसेच. केजरीवाल  मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी जादूची छडी फिरवावी आणि सर्व कामे व्हावीत अशा थाटात कामास सुरवात केली. पाण्याचा मुद्दा हातात घेतला, लगेचच वीज पुरवठ्याचा मुद्दा घेतला. त्याच बरोबर लोकपाल विधेयक टेबल वर आणले असे अनेक मुद्दे  एका झटक्यानिशी  हातावेगळी करण्याचा प्रयत्न केला.    मग काय व्हायचे तेंच झाले. एक ना धड भाराभर चिंध्या. सत्ता सोडून जावे लागले. एकही कार्य पूर्ण झाले नाही.

यावर मी बाप्याला म्हणालो मला एक कथा आठवते., " एकदा एका माकडांच्या समूहाने ठरवले कि आपण शेती करायची. मानवाने जंगल तोड केल्यामुळे आपल्याला अन्नाचा तुटवडा होतो. (राजकारण काय फक्त कॉंग्रेस आणि भाजप नेच करायचे?) त्यांनी जमीन मिळवली व  नांगरली. त्यात पेरणी केली. परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांनी माती उकरून पाहिली कि कोंब फुटले का? पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच. कोंब फुटण्याची इतकी घाई झाली कि रोजरोजच्या उकराण्याने ती बीजे अंकुरित झाली नाहीत आणि नष्ट झाली. " "असेच काहीसे केजरीवाल  यांच्या बाबतीत झाले."

बाप्या म्हणाला, "आमचा कबीर दास जर यांनी वाचला असता तर नक्कीच शहाणपण आलं असतं,"

"कबीरदास म्हणतात,              धीरे धीरे रे मना, धीरे सबकुछ  होय |                          
                                               माली सींचे सौ घड़ा, ऋतु आए फल होय  ||

कबीरदासजी म्हणतात, अरे मना  ( मन खुप चंचल असल्यामुळे मनाला उद्देशून) जरा धीर धर , इतका अधीर नको होउस. माळ्याला शंभर घडे पाणी द्याव लागतं. देखभाल करावी लागते. वाट पहावी लागते तेव्हा कुठे ऋतू (योग्य वेळ ) आल्यावर  त्या वृक्षांना फळ येत.

असा हा कबीर दोहा आमचे केजरीवाल यांनी  आत्मसात  केल्या असत्या तर त्यांच्यावर असा विदारक प्रसंग उद्भवला नसता.
दत्तात्रय पटवर्धन 

Tuesday, May 27, 2014

3 कबीराचे दोहे भाग 6


एकदा मी बाप्याच्या घरी  गेलो. आश्चर्य वाटतंय का? होत काहीतरी काम. पण मनात पक्क होत काहीतरी ऐकावं लागणार तेव्हांच माझ काम होणार.
मी घरी गेलो. घरातल्या सगळ्यांशी गप्पा मारल्या परंतु बाप्या काहीतरी विचारात गढलेला दिसला. मी त्याला विचारलं, "बाप्या काय विचार करतोय रे?"
बस, लगेच सुरु झाला. म्हणाला, "काल मला एक स्वप्न पडलं."
मी थोडा हादरलोच. बाप्याच स्वप्न!!!
तर बाप्या पुढे सुरु, " अरे काल माझ्या स्वप्नात, एक कुत्रा आणि मांजर आलं". आता तर मला ४४० व्होल्ट चा झटकाच लागला.
बाप्या म्हणाला, " तो कुत्रा आणि मांजर बोलत होते". बोंबला आता कुत्रा आणि मांजर बोलत होते,
मनात विचार आला आता बाप्याला ठाण्याला नाहीतर सरळ बंगलोर "निमांस" लाच न्यावे लागणार.
परंतु ऐकण तर भागच आहे. मीच  विचारलं, काय बोलत hote?"

तर बाप्या म्हणाला, " कुत्रा म्हणत होता, माझा घराचा मालक मला सर्व सेवा देतो. घरातील मंडळी मला प्रेम करतात, खायला देतात.
मला वाटते तो देव आहे.
मी म्हणालो "मग मांजर काय काय म्हणाली,"
बाप्या म्हणाला, " अरे मांजर म्हणाली, माझ्याही घराचा मालक मला सर्व सेवा देतो. घरातील मंडळी मला प्रेम करतात, घरातील मुले माझ्याशी खेळतात.
मला तर वाटते मीच देव आहे."

मी विचार करत आहे यातील बरोबर कोण? या बाप्याच्या परीक्षेत एक कठीण प्रश्न असणारच.
या एकाच प्रश्नात चारही 'life lines ' जाणार.
मी म्हणालो "बाप्या मांजरच बरोबर न!! बघ आसाराम बापू , किती सेवा मिळते, तीही लाखो लोकांकडून. किती प्रेम मिळते, अगदी सर्व कसे जीव द्यायला तयार होतात.
मग आसाराम बापू सारख्यांना मांजरीसाराखेच वाटते न!! ते चुकणे शक्य आहे का रे?"

त्यावर बाप्या चिडला व म्हणाला, अरे मांजरीला गर्व आहे. आणि कुत्रा विनम्र आहे. आपल्याच मालकाकडून (गुरुकडून) मान साम्मानाची अपेक्षा योग्य  नाही.

काबिर्दसाजी म्हणतात,  अहं अगीन हिरदै जरै, गुरु सो चाहै मान
                                     तिनको जम न्योता दिया, हो हमारे महेमान.

हृदयात अहंकाराचा अग्नी एव्हडा तीव्र आहे कि आपण जो आपल्यला सेवा देतो त्याच्याच कडून मान साम्मानाची अपेक्षा करतो. आपल्या गुरु कडूनच स्नामानाची अपेक्षा
केली जाते. अशा अहंकारी ना यमराजाचे  निमंत्रण असते कि या तुम्ही आमचे पाहुणे व्हा. तुम्ही गुरुभक्त होण्याच्या लायकीचे नाहीत. अहंकार हि दुखाची खान आहे. 



दत्तात्रय पटवर्धन 
  
वाचा 
 

0 केजरीवाल आणि राजकारण.


श्री अरविंद केजरीवाल खरच ज्यांनी भारतातील राजकारणाला नवीन दिशा दाखविली अल्पावधीतच भल्या भल्या राजकारण्यांना जमले नाही ते सर्व त्यांनी करून दाखविले, मिळवून दाखविले अगदी स्वप्नवत वाटावे अशी दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली आणि जनमानसात त्यांची स्वच्छ आणि प्रामाणिक प्रतिमा अधिकच उंचावली. खुर्चीचा मोह न धरता सत्तेवर कधीही पाणी सोडू शकतो हे सुद्धा त्यांनी दाखवून दिले. पण मग माशी कुठे शिंकली? एखाद्या निवडणुकीत यश नाही मिळाले म्हणून काही पक्ष संपत नाही, कारण खरच  सामाजिक चळवळी शी ज्यांची नाळ जोडली गेली आहे, फक्त समाज कारणाशी ज्यांनी सर्वस्व वाहिले असे प्रामाणिक कार्यकर्ते ह्या पक्षाशी जोडले गेले आहेत पण पुन्हा श्री अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातच राहण्याचा निर्णय त्यांच्या पक्षात आणि माझ्या सारख्या सामान्य माणसाला चक्रावून सोडणारा आहे त्याचे तर्कसंगत असे कारण आज तरी मिळत नाही किंवा त्यांचे समर्थक ही ते स्पष्ट करण्यात कुठे तरी कमी पडत आहे असे वाटते. आणि कार्यकर्त्यात संभ्रमावस्था निर्माण झालेली दिसते कोणी पक्ष सोडत आहे तर कोणी त्यांची भूमिका समजत नसल्याचे जाहीर पणे बोलत आहे.  मी तसा कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेला नाही पण एक देशाचा सर्वसामान्य नागरिक म्हणून काही  प्रश्न माझ्या मनात आलेत.  श्री अरविंद केजरीवाल आता किती दिवस तुरुंगात राहणार? त्याने काय साध्य होणार?  मोदी सरकार च्या शपथविधीत न जाण्या साठी या सारखी सोयीस्कर जागा दुसरी नाही हे त्यांच्या लक्षात आले का ? शपथ विधी नंतर कार्यकर्त्यांची भावना म्हणून तुरुंगातून बाहेर येणार का? श्री अरविंद केजरीवाल सुद्धा बाकी पक्षां सारखे राजकारण करणार काय? ह्याची उत्तरे येणारा काळच देईल हे मात्र खरे.


सतीश कुलकर्णी 

वाचा 
 

Sunday, May 25, 2014

0 कबीराचे दोहे भाग ५


मनुष्य जसजसा आधुनिकतेकडे मार्गक्रमण करू लागला तसतसा तो भौतीकातावादी होऊ लागला.
त्याला वाटू लागले मी राजमहालाच ऐश्वर्य भोगायला हवे. माझा जन्म त्याच साठी झालाय. मग हे ऐश्वर्य
भोगण्यासाठी वाटेल ते मार्ग अवलंबले तरी चालतील अशी त्याची भूमिका होऊ लागली. परंतु हे प्राप्त करण्यासाठी
थाबंयची सुद्धा तयारी नाही. सर्व कसे एका रात्रीत हवे. पैसा , ऐश्वर्य, नाव. यासाठी जीवाचं रान करण्याची तयारी.
मग या रानातून भटकताना होणारी जीवाची तगमग याकडे दुर्लक्ष.. इथेहि थांबायची तयारी नाही तर माझ्या ७ पिढ्या कशा खातील याचा विचार.
याच विचारांमुळे  २ जी घोटाळा, तेलगी घोटाळा , सत्यम घोटाळा, बोफोर्स घोटाळा, चारा घोटाळा, हे  तर काय आम्ही हुतात्म्यांच्या
शवपेटीतही घोटाळा करण्यास शरम बाळगत नाही. त्यानंतर  जेल, तरी निर्लाजाप्रमाणे जीवन आनंदाने जगणे, अशा संस्कृतीचा जन्म.

आयुष्यभर नाशवंत वस्तूंची जमवाजमव करीत असतात त्यामुळे इर्षा, द्वेष, मत्सर, क्रोध, अहंकार हे शत्रू त्यास सतावत असतात.
याचा परिणाम म्हणून चिंता, त्रागा, ताण या विकारांना आमंत्रण. यापासून सुटकारा मिळण्य साठी मग मानसिक तज्ञ, स्ट्रेस मैनेजमेंट चे क्लास्सेस.,
संधिसाधू संताचा सहारा घ्यावा लागतो. असे हे दुष्ट  चक्र चालू राहते. आणि जीवनाच्या अंती लक्षात येते कि फलंदाजी, गोलंदाजी आणि  क्षेत्ररक्षण
या सर्व आघाड्यांवर आपण विफल ठरतो  आणि एका दारूण पराभवाला सामोरे जावे लागते. तेव्हा लक्षात येते कि आपण परमात्म्याच्या
ओउट ऑफ रेंज गेलेलो आहोत.  मग सिकंदर सारख्या जगजेत्यालाही म्हणावे लागते माझी सर्व संपती घे ऐर्श्वर्य घे,  राज्य घे पण मला
काही क्षण दे 'जगण्यासाठी'. पण सर्व निरर्थक, वेळ येते आणि आपणास म्हणावेच लागते ' आम्ही जातो  आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा.
  या सर्व दुक्खातून दूर जाण्यासाठी  काबिर्दस्जी म्हणतात,

साई इतना दिजिए जामे कुटुम समाय
मै भी ना भुखा रहु , साधू ना भुका जाये

काबिर्दज्साजी परमात्म्याजवळ एवह्दिच मागणी करतात कि, मला  एव्हडाच दे ज्यात माझ कुटुंब चालेल, एव्हडाच दे कि मला
दोन वेळेचं जेवण मिळेल आणि येणारही उपाशी जाणार नाही. किती हि एका दिवसाची मागणी. यात उद्याचाच विचार नाही मग भविष्याचा प्रश्नच उरत नाही.
सात जन्माचा तर नाहीच नाही. इतक मन समाधानी असायला हव म्हणजे जे कर्म होत ते इर्षा, द्वेष, मत्सर, क्रोध, अहंकार याच्या शिवाय होते.आणि मग
जीवनात आनंद भरून येतो.

 दत्तात्रय पटवर्धन

वाचा

शायरीचा गुलदस्ता. भाग १ 

बुद्धिबळातील प्यादे.

कबीराचे दोहे भाग ४ 

कबीराचे दोहे भाग 3

वळून पाहताना ! भाग 1

अनामिक का सफर : १

 

 

 

 

 

Tuesday, May 13, 2014

2 कबीराचे दोहे भाग ४



काल बाप्या असाच फिरत फिरत घरी आला. जरा आनंदातच दिसत होता.चहा पिता पिता म्हणाला, एक कोडं विचारू का?”.  मी म्हणालो, अरे बाप्या, तू स्वताच एक कोडं आहे रे. मला अजून किती कोड्यात टाकशील. तुझी केमिस्ट्री समजणे अगदी कठीण. 
मला अनुभवाने माहित होत की हा काही ऐकणार नाही, मलाच ऐकावं लागेल. म्हणून म्हणालो, “सांग 
बाप्या म्हणाला, " एक मासा दुसऱ्या माशाला काय म्हणाला असेल?" 
मी म्हणालो, " भलतच काय! घेऊन तर नाहीस ना आला.".
हा असा इब्लीस बाप्प्या! दिसायला साधा सरळ पण कधी सरळ चेंडू टाकेल तर कधी क्यारम चेंडू टाकेल याचा नेम नाही. तो घरात असे पर्यंत माझ, “काय विचारेल, काय विचारेल” असं चाचपण सुरु असतं. अन एकदा गेला की, “हुश्श!”. माझा शाळेत दरारा पण, येथे...  नेहमी प्रमाणे, मी काही तरी उत्तर द्यायचं अन त्यान वितभर छाती फुगवून, एखाद्या कसलेल्या टी.व्ही. वरच्या अन्कर सारखा खर्जातील आवाजात, “आणखी एक चान्स” म्हणायचे,. त्यापेक्षा सरळ शरण येणे मी आज पसंद केले, अगदी “विना-अट शरणागती!”       
मला माहित होतं याच्या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर देता येणार नाही म्हणून मी विचार करण्याचा प्रयत्नच न करता शरणागतीचा मार्ग अनुसरला.
बाप्या.मग विजयी मुद्रेने म्हणाला, ऐक मीच सांगतोअरे एक मासा दुसऱ्या माशाला काय वेगळं सांगणार. तो मासा दुसऱ्याला म्हणाला, “तू जर तोंड वंद ठेवलस तर कधीहि गळाला अडकणार नाही. 
 
एखाद्या तत्ववेत्याच्या शैलीत तो विग्रजीत पुढे बोलता झाला,"If you keep your mouth shut, you will never get caught."  माझ्याकडे मोहरा वळवत तो म्हणाला, “ आपलही असच आहे. माणसाने तोंड उघडल रे उघडल कि काही घोटाळा होण्याची शक्यता निर्माण होते – मग ते बोलण्यासाठी असो की खाण्यासाठी.” बाप्प्याचे हे बोलणे मला जरा जास्तच वाटले. मी त्यला म्हणालो,”काहीतरीच काय बोलतोस! खाण्यासाठी तोंड उघडल्याने काय मोठे आभाळ कोसळणार आहे. असल्या फालतू प्रश्नाला अडखळेल तो बाप्प्या कसला! एखाद्याने Point Blank वरून सरळ खोपडीत गोळी घालावी तश्या पद्दतीने त्याने माझ्या तोंडावर धडधड वाक्ये फेकली, “हे आता कळणार नाही, पण जेव्हा एखादा डॉक्टर तुम्हाला ‘मीठ किवा साखर खाऊ नका’ असे सांगेल, तेव्हा एव्हढासा चेहराकरून घरी याल अन वाहिनीना म्हणाल, ‘बाप्प्याच तेव्हा ऐकलं असत तर बर झालं असत. पण वेळ गेलेली असेल. तेव्हा सावध व्हा. तोंडावर नियंत्रण ठेवायला शिका म्हणजे कधीही अशी विचित्र परिस्थिती निर्माण होणार नाही.

काही तरी बोलायचं म्हणून मी म्हणालो, अरे  बाप्या, तोंड अगदी बंद ठेऊन कसे चालेल. खाण्यापिण्यासाठी का.... मला मध्येच थाबवत तो शांतपणे म्हणाला, " कधी कबीर वाचला आहेस का?”  आधीचा अनुभव लक्षात घेऊन मी पुन: चूप रहाणेच पसंद केले. थोड्यावेळाने  उत्तर येत नाही असे पाहून तो स्वत:च उत्तरला, “कबीरदास म्हणतात –


ऐसी वाणी बोलिये, मनका आपा खोल,
औरन को सितल करे, खुदही सितल होय|
 
      मी ह्या प्रश्नोतराने वैतागत बोललो, “बाप्प्या, आज काय माझा पोपट करायचं ठरवून आला आहेस काय? मासा काय, कबीरदास काय! सगळ कसं डोक्यावरून जात, अन तू इकडे अर्थ सांगत बसलायस.” तर हा माझ्या त्राग्याकडे कानाडोळा करीत बोलला,”अरे अशा वाणीचा उपयोग करा ज्यामुळे दुसऱ्याच मन शांत होईल,  ऐकणाऱ्याच्या मनाआनंद येईल - न कि त्याच्या मनात कडवेपणा, द्वेष, क्रोध, भाव जागृत होईल.” एक सुस्कारा सोडून बाप्प्या पुढे म्हणाला, “तुमचा दोष नाही, तुम्हाला कबीरदास, रामदास, इ सारखे संत कळत नाही कारण तुम्हाला हवी असतात पाश्चिमात्य पुस्तके, 'How to win friends',  'How to influence people', How to ---.अरे इथे साक्षात ज्ञानरूपी-काऊ(Cow) उभी असताना तुम्हाला हाऊ(How) कसे सुचते तेच काळात नाही.”  
 
     बाप्प्या खर बोलत होता. आम्ही डेल कार्नेजी वाचतो पण, संतवचने वाचण्यात कमीपणा समजतो. आज वाटायला लागले की बाप्प्या असाच रोज यावा म्हणजे रोज एक दोहा/श्लोक तरी कानावर पडेल. मनोमन मी वाकून बाप्प्याला दंडवत घालता झालो.



आपल्या प्रतिक्रिया नमूद करा.
दत्तात्रय पटवर्धन 

Sunday, May 11, 2014

2 कबीराचे दोहे भाग 2

आपल्या समाजात प्रवाहाच्या विरुध्द जाणाऱ्या प्रत्येक सुधारकाला अनेक संकटाना सामोरे जावे लागले आहे. मग ते ज्ञानेश्वर , तुकाराम, कबीर,मीरा , फरीद, व सोक्रेटीस व ग्यलेलिओ. या मंडळीना रूढीवादी लोकांना आपले म्हणणे /तत्वज्ञान कसे खरे आहे, सत्य आहे हे समजावताना आपला बळी द्यावा लागला आहे.
कबीरदासजी म्हणतात : -   

" साधो देखो जग बौराना,
साची कहे तो मारन धावे झुटे जग पतीयाना".
हे जग किती विचित्र आहे न!! खरं सांगितले कि मारायला धावते आणि खोट्याला जवळ करते. सत्य, वास्तविकता दाखवणाऱ्या वर रोष ओढवते तर खोट्यावर विश्वास ठेवते.जणू खऱ्याला कोणी वालीच नाही. आजच्या युगात सर्वधर्म समभाव थोड्याफार फरकाने कबीरदासजींच्या वरील उक्तीचे समर्थनाच करतो न!!
एकदा एका गुरूने आपल्या दोन शिष्यांना पाय चेपण्यास सांगितले. एकाने डावा  पाय तर दुसऱ्याने उजवा पाय दाबायला सुरवात केली. दोघेही गुरुचे सच्चे भक्त असल्यामुळे गुरुचे पाय मोठ्या आनंदाने व तन्मयतेने चेपत होते. एव्हड्यात गुरूने कूस बदलली व त्यांचा डावा पाय उजव्या पायावर पडला. उजवा पाय दाब्णाऱ्या शिष्यास आता पाय नीट चेपण्यात डाव्या पायाचा अडसर येऊ लागला म्हणून त्याने दुसऱ्या शिष्यास गुरूचा  उजवा पाय हलविण्यास सांगितले.  गुरूच्या सेवेत अडथळा येऊ नये म्हणून उजवा पाय दाबणार्या शिष्याने नकार दिला. आता दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली व ती शेगेला पोहोचण्यास वेळ लागला नाही. दोघांनी काठ्या उचलल्या. प्रथम डावा पाय दाबणार्या  शिष्याने गुरूच्या उजव्या पायावर प्रहार  केला. उत्तरादाखल उजवा पाय दाबनार्याने त्याच्या डाव्या पायावर प्रहार केला. मोठा विचित्र प्रकार होता. गुरूची सेवा डोळे झाकून केल्याने रूढीवादी व्यक्ती सारखे आंधळे झाले होते. त्यांच्या डोळ्यावर सेवेचा भ्रामक पडदा होता.
कबीरदासजी पुढे  म्हणतात, 
"हिंदू कहत है राम हमारा, मुसलमान रहेमाना,
                                                आपस मे दोउ लडे मरत है मरम न कोई जाना"
येथे कबीराला हिंदू आणि मुसलमान हे दोन प्रतिक आहेत. ते सर्वच धर्मांना उद्देशून म्हणतात. हिंदूंचा राम अन मुसलमानांचा रहेमान -- अगदी गुरूच्या डाव्या  व उजव्या पायाप्रमाणे! यावरून दोघे वाद घालतात, भांडतात. वेळ आली तर मारतात व मरतात . दोघेही मर्म जाणून घेत नाहीत. अरे मंदिर काय व मस्जिद काय, त्या परमात्म्याचाच घर न? धर्माच मर्म सांगत सांगत सारे संत महंत आले-गेले पण आम्ही एकमेकांच्या धर्माचे वाभाडे काढण्यात धन्यता मानतो. "ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय" ,  "खरा तो  एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे" असा प्रेमाचा महिमा सारेच गाताना दिसतात पण त्याचा खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करीत नाहीत. प्रेमात समर्पण भावना असते. दुसऱ्यासाठी प्राण द्यावे लागतात, प्राण घ्यावे लागत नाहीत.
सद्य परिस्थिती पाहून तर एक उर्दू शायर मोठ्या कष्टाने म्हणतो,
"कितनी नफ़रते है तास्सुब (communal ) कि हमारे दिलो मे,
हमे थोडी समज देता तो अच्छा होता,
परिंदे तो आपस मे बैर नही करते,
खुदा तू इस दुनिया को चिडियाघर बना देता तो अच्छा होता."

नवयुगात माणूस खोल समुद्रात, उंचच उंच आकाशातच नाही तर चंद्रावर घर  करण्याच्या विचारात आहे. विज्ञानाने आम्हाला प्रगतीच्या वेगवेगळ्या स्तरावर नेले असले तरी माणसातील माणुसकी जिवंत ठेऊ शकलेला नाही. दृष्टांताच्या शब्दात सांगायचे तर ---  एक संत भर दिवसाहि हातात मशाल घेऊन फिरत असे. त्याला लोकांनी विचारले कि इतक्या भर दिवसा सूर्यप्रकाशात हातात मशाल घेऊन का फिरत आहात?  संताने उत्तर दिले, 'मी माणसाच्या शोधात आहे. मला कोठेही माणूस आढळत नाही"

घरो पे नाम थे, नामो के साथ ओहदे थे,
बहुत तलाश किया , फिरभी आदमी न मिला. 

 दत्तात्रय पटवर्धन 

1 कबीराचे दोहे भाग 1

एका राजमहालातील एक पाल, मोठ्या आनंदात राजमहालाच्या छतावर विहरत होती. राजमहालाचे   ऐश्वर्य, राजमहालाच सौंदर्य याचा आनंद लुटत होती. दुसरी पाल बाहेरून आली आणि त्या पालीला म्हणाली, चलतेका सिनेमाला?” पहिली पाल रागाने म्हणाली, तुला कळत नाही, मी छत सांभाळून आहे. मी सिनेमाला आली तर हे छत कोण सांभाळणार?
बरोबर आहे!! बैलगाडीच्या खालून चालणाऱ्या कुत्र्यालाही असेच वाटते कि तोच गाडी चालत आहे. हा दोष त्याचा नाही त्याच्या अहंकाराचा आहे. अहंकार प्रत्येकाच्या स्वभावात आहे.  गौतम बुद्ध म्हणतात कि तुमच्या पेक्षा सर्वात  मोठा तुमचा मित्र कोणी नाही व तुमच्या पेक्षा तुमचा मोठा शत्रू कोणी नाही. सत्कृत्दर्शनी अत्यंत विरोधाभासी वाटते. तुम्हीच मित्र आणि तुम्हीच तुमचे शत्रू कसे शक्य आहे? अगदी सोपे त्रैराशिक! मी (-) अहंकार = तुम्ही तुमचे मित्र , तर मी (+) अहंकार = तुम्ही तुमचे शत्रू. बघा, जमतंय का. हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.
तसे पाहिले तर प्रत्येक बाब हि आपल्यावरच अवलंबून असते. आपण या पृथ्वीतलावर जगतो आणि मेल्यानंतर स्वर्गात जाण्याच्या गोष्टी करतो. परंतु जिथे आपण आपले अवघे जीवन व्यतीत करतो त्या पृथ्वीला स्वर्ग बनवण्याचा विचारसुद्धा आपल्या मनात येत नाही. मेल्याशिवाय स्वर्ग नाही पण मरणाची तयारी नाही. मग स्वर्ग कसा मिळणार? ‘सदेह स्वर्गारोहण’? व्वा! व्वा! छान कल्पना! आम्ही "म" च्या ऐवजी "मा" करायला तयार. एक धर्म दुसऱ्या धर्मावर कुरघोडी करत एकमेकांना मारू लागले तरी बेहेत्तर.
कबीरदासजी म्हणतात,
 घुंगट के पट खोल रे तोहे पिया मिलेंगे, 
घट घट मे वो साई रमता कटुक वाचन मत बोल रे, तोहे पिया मिलेंगे.'

       कबीरदासजी वरील दोह्यातून हीच संकल्पना मोठ्या कल्पकतेने आमच्या पुढे सादर करतात.  कबीराच्या प्रत्येक शब्दाचा आनंद लुटता येतो. घुंगट, पदर जेव्हा डोळ्यावर असतो तेव्हा आम्हाला हे भौतिक  जग दिसत नाही. सर्वदूर अंधार दिसतो, भीती निर्माण होते, आत्मविश्वास डळमळतो.  अन अहंकाररूपी पदर जर आंतरिक डोळ्यावर असला तर......  आम्हाला परमात्मा कसा दिसेल? आणि या परमात्म्याचे दर्शन झाले कि तेथे अंधार राहील का? सगळीकडे प्रकाशच प्रकाश, तेजच तेज. जणू स्वर्गच!
येशू ख्रिस्ताला जेव्हा विचारले कि स्वर्गात कोण जाईल? तर क्रीस्ताने एका लहान मुलाला उचलले आणि म्हणाला, 'हा जाईल याचाच अर्थ असा कि जो लहानमुलाप्रमाणे निरागस  असेल, ज्याच्यात अहंकार नसेलतोच स्वर्गाचा अधिकारी.
कबीरदास पुढे म्हणतात कि, 
घट घट मे वो साई रमता, कटुक वचन मत बोल रे.तोहे पिया मिलेंगे.   
      प्रत्येकात परमात्मा वास करतो. म्हणून शरीराला परमात्म्याचे मंदिर मानले आहे. देह देवाचे मंदिर आहे. एक सुंदर उर्दू शेर आठवतो –
                       " हम तो दिल मे लिए फिरते है तस्वीरे-यार , जरासी गर्दन झुकाई और दिद कर लिए 
      आत्माराम सर्वांच्या हृदयात असतो. मात्र तो सर्वाना दिसत नाही. तस्वीरे-यारच्या/प्रियतमाच्या दर्शनसाठी गर्दन (मान) झुकविण्याची तयारी असावी लागते. परंतु आड येतो तो आमच्यातील  अहंकार.  गम्मत बघा, जर अहंकार त्यागलात तर किती सहजतेने प्रियतमाचे/आत्मारामाचे दर्शन होऊ शकेल. प्रत्येकाच्या हृदयात  परमेश्वर आहे म्हणून कोणासाठीटू शब्दाचा उपयोग करू नका, अशीच शिकवण कबीरजी देतात. 

दत्तात्रय पटवर्धन