Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.
Showing posts with label urdu shayari. Show all posts
Showing posts with label urdu shayari. Show all posts

Saturday, June 27, 2015

0 शायरीचा गुलदस्ता भाग १५




मला उर्दू शायरीचे वेड केव्हा लागले हे निश्चित आठवत नाही. बहुदा शालेय वयातच माझा आणि उर्दू शायरीचा संबंध आला असावा. उन्हाळ्याच्या सुटीत असाच एक पुस्तक  वाचत बसलो  होतो आणि एक शेर वाचण्यात आला. उन्हाळा सुरु असल्यामुळे हवा मुळीच नव्हती. झाडाच पानही हलत नव्हत. या कडाक्याच्या उन्हात सर्वजण हवेच्या झुळूकीची वाट पाहत असत.हवेची जराशी झुळूक आली कि अगदी हायसं वाटायचं. तो शेर मी दोन तीन वेळा वाचला आणि अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. शेर असा होता,

हवा चले ना चले लोग इंतजार में है ,
खुली हुवी है अभी, खिडकिया मकानो की.            ----  कैसरुल जाफरी

मला वाटले की लोकांनी घराच्या खिडक्या उघडून ठेवल्या आहेत. कारण गर्मी खुप आहे. हवा येवो अथवा ना येवो परन्तु लोकांची प्रतीक्षा चालूच आहे. आणि वरवर पाहता मला वाटलं की कविने याच परिस्थितीचे वर्णन केलेलं असावं.

पुढे मोठा झालो विचारांची खोली वाढली आणि लक्षात आलं की या दोन ओळींच्या मध्ये खूप काही दडलं आहे. मग हि हवा कसली तर हि हवा आहे बेहतर जीवनाची, सच्चाई ची, बेहतर समाजाची, खुशाली ची अगदी सध्याच्या BJP च्या " अच्चे दिन आनेवाले है" या घोषणेत दडलेल्या विचारांची. आता 'खिडकिया मकानोकी' याचा संकेत कुठे आहे, तर तो ' रुधयाची कवाडे,' बुद्धीची कवाडे ' याकडे  आहे.

म्हणजेच 'अच्चे दिन आनेवाले है' या प्रतीक्षेत लोकं आपल्या हृदयाची कवाडे उघडून बसली आहेत. रामराज्य यईल, सर्वदूर न्यायाचा बोलबाला असेल, समाजात असलेली श्रीमंत गरीब यांच्या तील दरी नष्ट होईल, समाजातील असमानातेला तिलांजली दिली जाईल. जगात
खुशाली नांदेल. अशा हवेच्या प्रतीक्षेत माणसे आपल्या घराची दारे, खिडक्या  उघडून बसले आहेत. आशा आहे या जगाच नंदनवन होण्याची , उम्मीद अजून बरकरार आहे. अशी शायरी वाचली कि वाटतं मातीच्या इवल्याश्या भांड्यात जणू समुद्र भरून ठेवला आहे.

उर्दू शायरी मध्ये अथवा कोणत्याही कवितेत संकेत कोठे आहे हे कळणे महत्वाचे असते. शायर आपल्याला कोणत्या दिशेने नेत आहे याची जाण यावी लागते. 


 दत्तात्रय पटवर्धन

Thursday, June 11, 2015

0 शायरीचा गुलदस्ता भाग १३



जगात काही माणसे आभाळा एव्हडं काम करून जातात. सर्वच माणसे इच्छा असून देखील भव्य दिव्य काम करू शकत नाहीत. परंतु काही माणसे रस्त्यातून जाताना रस्त्यातील काटे उचलण्याचे काम करतात जेणे करून त्यांच्या मागून येणाऱ्यांना त्या काट्यांचा त्रास होऊ नये. व अशा लोकांना काही काटे कमी करण्याच श्रेय द्याव लागत. अशा रीतीने प्रत्येक व्यक्ती काहीना काही योग्य कार्य करून या जगाला सुंदर करीत असते.

साहीर लुधियानवी यांचा एक शेर याच गोष्टीचा उहापोह करतो,

माना की इस जमीं को न गुलजार कर सके,
कुछ ख्वार कम तो कर गए, गुजरे जिधर से हम.

साहिरजी म्हणतात, "आम्ही या जगाच नंदनवन तर करू शकलो नाही परंतु ज्या ज्या मार्गावरून आम्ही प्रवास केला त्या मार्गातील काही काटे कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच केला." कुछ ख्वार, येथे हाही अहंकार बाळगलेला नाही कि सर्व काटे दूर केले. आम्हाला शक्य होते तितके केले.


सर्व प्रथम ज्या व्यक्तीने आपल्या घराबाहेर रात्रीच्या वेळेस दिवा लावण्यास सुरवात केली तेव्हा त्या व्यक्तीची सर्वांनी थट्टा केली. त्याच मार्गावरून जाताना  ज्या ज्या लोकांना त्या दिव्याच्या उजेडामुळे मार्गक्रमण करण्यास मदत झाली त्यांनीही आपल्या घराबाहेर दिवा लावण्यास सुरुवात केली आणि येथूनच स्ट्रीट लाईट ची कल्पना जगासमोर आली. आज त्या व्यक्तीच्या या छोट्याश्या कृत्यामुळे आम्हाला स्ट्रीट लाईट मिळाले. हे जग सुंदर होण्यास मदत झाली. असेच रात्यावरून काटे वेचत चला एक दिवस नक्कीच या जगाच नंदनवन होईल.जगाच नंदनवन करण्यात आपलाही खारीचा वाटा असावा.

जां निसार खां अख्तर यांचाहि असाच एक शेर आहे.

जिंदगी ये तो  नहीं तुमको सवारा ही न हो,
कुछ न कुछ कर्ज तेरा हमने उतारा ही न हो.

मान्य आहे कि  निसर्गाने आम्हाला भरभरुन दिलेलं आहे.  या जीवनाचे आमच्या वर खूप उपकार आहेत. परंतु हे जीवन सुंदर करण्यास आम्ही काहीच केले नाही असे नाही. हे उपकार, कर्ज फेडण्यासाठी आम्हीही काहीना काही केलेलं आहे. आमचा खारीचा वाटा नक्कीच थोडं कर्ज उतरवण्याच काम करीत आहे.

दत्तात्रय पटवर्धन.

Tuesday, June 2, 2015

0 शायरीचा गुलदस्ता भाग 12



मैत्री म्हटली कि ती मैत्री निभावण्याच्या आणाभाका , त्या शपथा, आठवतात. अनेक वेळा काहीना काही कारणावरून दिलेला शब्द  निभावता येत नाही  आणि मैत्री तुटते. या आणाभाका ज्याला उर्दूत 'वफा' म्हणतात आणि त्याविरुद्ध म्हणजे 'जफा'.
वफा आणि जफा या दोन शब्दांचा उपयोग  उर्दू शायरीत अनेक वेळा केलेला आढळतो. प्रेमावर जितकी शायरी आहे तितकीच शायरी वफा आणि  जफा वर आहे.

आता हाच शेर पहा,

जफ़ा के जिक्र पे तुम क्यो  संभल के बैठ गए,
तुम्हारी बात नहीं, बात है ज़माने की .                                          मजरूह सुल्तानपुरी

असे म्हणतात की truth should be sugar coated,  कारण सत्य गिळण्यास कठीण असतं. येथे शायर एक sugar coated pill आपल्याशी जफा (शपथेचा भंग करणाऱ्याला ) करणाऱ्याला देत आहे. तो म्हणतो की जेव्हा जफा ची ( जुलुमाची, शपथ तोडल्याची ) चर्चा सुरु झाली त्यावेळेस तू स्वतःला सावरून बसलीस. कारण तुला भीती होती की कुठे यात तुझंही नाव तर येणार नाहीना? तुलाही माहित आहे  की घेतलेल्या शपथेचा भंग कोणी केला. तुझी ती दयनीय स्थिती बघवली नाही व मी तुला इशारा केला की आंम्ही तुझी  गोष्ट करीत नाहीत,  be comfortable, be relaxed, आम्ही तर जगाची गोष्ट  करीत आहोत की हे जग किती जुलमी आहे. किती सौम्य रीतीने शायर तिच्या तोडलेल्या शपथेची कल्पना तिला करून देत आहे.

रंज तो ये है की वो अहले-वफ़ा टूट गया,
बेवफा कोइ भी हो, तुम न सही, हम ही सही.                              डॉ राही मासूम रझा

मैत्रीत केलेल्या आणाभाका अनेक वेळा तुटतात, त्याला नक्कीच कोणी न कोणी जवाबदार असतो. शायर म्हणतो की आपली मैत्री तुटली याच मला दु:ख आहे. आपण मैत्री निभाऊ शकलो नाही हीच जीवनाची tragedy  आहे. मग हि मैत्री कोणामुळे तुटली हा भाग दुय्यम आहे. तुझ्यामुळे नाही तर मान्य आहे की माझ्यामुळेच हे झाले. या वर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. आपली मैत्री तुटली हीच एक गोष्ट सत्य आही आणि त्याचच मला दु:ख आहे.

मेहबूब से भी हमने निभाई बराबरी,
वां लुत्फ़ कम  हुवा, तो यहाँ प्यार कम हुवा.                             मोमिन खां मोमिन

लुत्फ़ : आनंद, मजा , मिठास

शायर म्हणतो की मेहबूब बरोबर आम्ही बरोबरी निभावली. तिकडे लुत्फ़ कमी झाला म्हणजेच तिच्यातल सौंदर्य कमी झालं , तिच्या बरोबर बसण्यात आणि गप्पा मारण्यातला आनंद कमी झाला, तिच्यातली मिठास कमी झाली म्हणून आमच् प्रेमही कमी झालं. असा अर्थ आपण लुत्फ़ चा डिक्शनरी अर्थ घेतल्यास काढू. इथेही शायर एक sugar coated pill देत आहे. येथे लुत्फ अर्थ आहे वफाई कडे. तो म्हणतो की तिकडे वफा कमी झाली आणि त्याच प्रमाणात इकडे प्रेमही कमी झाले. अशा रीतीने आम्ही बरोबरी निभावून नेली. अप्रत्यक्षरित्या शायर दोष आपल्या कडे ठेवून तिला तिच्या बेवफाईची  जाणीव करून देत आहे.


दत्तात्रय पटवर्धन

Sunday, May 31, 2015

1 शायरीचा गुलदस्ता भाग 11


उर्दू शायरी मध्ये 'चिराग' शब्दाचा प्रयोग अनेकदा केलेला आपणाला आढळतो. चिराग या शब्दाचा अर्थ 'दिवा' असा होतो.परंतु चिराग हा शब्द वेगवेगळ्या संकेताने अनेक वेळा वापरलेला दिसतो. असाच एक शेर पहा,

शहर के अंधेरे को इक चिराग काफी है.
सौ  चराग जलते है इक चराग जलनेसे.                         अज्ञात

समाजात जो अंधार पसरलेला आहे, ज्या कुप्रथा रूढ झालेल्या आहेत त्या दूर करण्यासाठी एका दिव्याची गरज असते. येथे 'चिराग' हा शब्द आदर्श, सभ्य, संस्कारी माणसाच प्रतिक आहे. एक झिजस, एक राम, एक महात्मा गांधी, एक सावरकर, एक भगत सिंग, एक टिळक,  एक बाबासाहेब आंबेडकर, हजारो लाखो लोकांना जागृत करतात. अन्याया विरुद्ध जुलमी राजवटी विरुद्ध, उठाव करण्यास प्रवृत्त करतात.  अशी एकच व्यक्ती समाजातील  अंधकार दूर करण्यास समर्थ असते कारण तोच दिवा हजारो दिव्यांना प्रज्वलित करतो म्हणजेच एक व्यक्ती हजारो लाखो लोकांना कार्य सिद्धीस नेण्यास प्रवृत्त करत असते.

हथेलियोने  बचाया बहुत चरागों को,
मगर हवा भी अजब जाविए बदलती है.                           अज्ञात

जाविए : कोण, angles

जेव्हा हवा सुरु होते तेव्हा दिवा विझु नए म्हणून आपण त्या दिव्याला हाताने झाकतो. येथे 'चराग' म्हणजे एखादा उत्कट विचार, संस्कार, प्रथा, किव्वा सभ्यता. 'हथेली' हे सभ्य माणसाच प्रतिक. म्हणजेच सभ्य माणसांनी हे संस्कार, ही सभ्यता समाजात  टिकून राहण्यासाठी कसोशिने प्रयत्न केलेत. परंतु "हवा भी अजब जाविये बदलती है."   परंतु जुलुमी हवा वेगवेगळ्या दिशेने या दिव्यावर आक्रमण करून हा दिवा विझवण्याचा प्रयत्न करत असते.

दत्तात्रय पटवर्धन

Wednesday, May 28, 2014

0 शायरीचा गुलदस्ता. भाग २


उर्दू  मध्ये 'मय' म्हणजे 'मद्य'. प्रेमी युगलाना या प्रेमरूपी मद्याची  धुंदी  चढते. हि इष्काची धुंदी याला नशा म्हटलं जात. यातच कधी  प्रेयसीचा वियोग होतो आणि या वियोगाच्या दुक्खा मुळे व ते विसरण्यासाठी तो मादिरालयात जाऊन पोहचतो. याच मादिरायला 'मयकदा' किव्वा 'मयखाना' असे म्हणतात. आता मदिरालय म्हटलं कि मद्य देणारी युवती म्हणजे 'साकी' अथवा 'साकीया' आणि तिच्या हातातील प्याला येतोच. हा प्याला म्हणजे 'जाम' अथवा 'सागर'. या मद्याची धुंदी म्हणजे 'सरूर' आणि हि अवस्था पुष्कळ वेळ राहते त्याला 'खुमार' म्हणतात.

उर्दू शायरी मध्ये हे शब्द वारंवार  येतात. त्यामुळे अनेकवेळा असे वाटते कि उर्दू शायर हा मदिरा आणि मदिरालय याचा पुरस्कर्ता आहे. त्यामुळे शायरी आणि शायर हे बदनाम झालेले आहेत. उर्दू शायरी मध्ये हे सर्व शब्द अनेकवेळा प्रतीकात्मक म्हणून वापरले जातात.

उसके पैमाने कुछ और, मेरे पैमाने में कुछ और
देखना साक़ी हो न जाये, तेरे मैखाने में कुछ और |

इथे शायर या सर्व बदनाम शब्दांचा प्रतीकात्मक म्हणून उपयोग करतो. मैखाना म्हणजे जग, (world ) साक़ी म्हणजे देव आणि
पैमाना म्हणजे नशीब असे संकेत वापरलेले आहेत.

आता येथे शायर देवाला नेहमीचाच प्रश्न विचारत आहे. कोणाच्या नशिबात  काय तर कोणाच्या नशिबात काय. अरे देवा तुझ्या या जगात
असाच अन्याय चालेल तर एक दिवस मोठा हाहाकार माजेल.

असाच पुढील शेर पहा,

इक जगह बैठकर पी लूं ये मेरा दस्तूर नहीं,
मैकदा तंग बना लू ,  मुझे मंजूर नहीं |

आता हा शायर कसा अगदी पियक्कड़ वाटतो ना?   येथे 'मैकदा तंग बनादू ' विचारांना सीमित ठेवणे (confinement of thought ) असा आहे.प्रत्येक धर्मात कर्मकांडाच्या
विशिष्ट सीमेत माणसाला बांधून ठेवलं आहे ( religious dogmas ) . त्यापलीकडे जाऊन विचार करण्याला पाबंदी आहे . म्हणून शायर म्हणतो कि, मला या विचारांच्या
पलीकडे जायचं आहे एखाद्या विशिष्ट ढाच्यात बसून विचार करणे माझ्या स्वभावात नाही आणि विचारांना सीमित ठेवण मला मंजूर नाही. 


 दत्तात्रय पटवर्धन 
विजया यादव  

वाचा