Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.
Showing posts with label buddhibal. Show all posts
Showing posts with label buddhibal. Show all posts

Tuesday, May 27, 2014

0 केजरीवाल आणि राजकारण.


श्री अरविंद केजरीवाल खरच ज्यांनी भारतातील राजकारणाला नवीन दिशा दाखविली अल्पावधीतच भल्या भल्या राजकारण्यांना जमले नाही ते सर्व त्यांनी करून दाखविले, मिळवून दाखविले अगदी स्वप्नवत वाटावे अशी दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली आणि जनमानसात त्यांची स्वच्छ आणि प्रामाणिक प्रतिमा अधिकच उंचावली. खुर्चीचा मोह न धरता सत्तेवर कधीही पाणी सोडू शकतो हे सुद्धा त्यांनी दाखवून दिले. पण मग माशी कुठे शिंकली? एखाद्या निवडणुकीत यश नाही मिळाले म्हणून काही पक्ष संपत नाही, कारण खरच  सामाजिक चळवळी शी ज्यांची नाळ जोडली गेली आहे, फक्त समाज कारणाशी ज्यांनी सर्वस्व वाहिले असे प्रामाणिक कार्यकर्ते ह्या पक्षाशी जोडले गेले आहेत पण पुन्हा श्री अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातच राहण्याचा निर्णय त्यांच्या पक्षात आणि माझ्या सारख्या सामान्य माणसाला चक्रावून सोडणारा आहे त्याचे तर्कसंगत असे कारण आज तरी मिळत नाही किंवा त्यांचे समर्थक ही ते स्पष्ट करण्यात कुठे तरी कमी पडत आहे असे वाटते. आणि कार्यकर्त्यात संभ्रमावस्था निर्माण झालेली दिसते कोणी पक्ष सोडत आहे तर कोणी त्यांची भूमिका समजत नसल्याचे जाहीर पणे बोलत आहे.  मी तसा कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेला नाही पण एक देशाचा सर्वसामान्य नागरिक म्हणून काही  प्रश्न माझ्या मनात आलेत.  श्री अरविंद केजरीवाल आता किती दिवस तुरुंगात राहणार? त्याने काय साध्य होणार?  मोदी सरकार च्या शपथविधीत न जाण्या साठी या सारखी सोयीस्कर जागा दुसरी नाही हे त्यांच्या लक्षात आले का ? शपथ विधी नंतर कार्यकर्त्यांची भावना म्हणून तुरुंगातून बाहेर येणार का? श्री अरविंद केजरीवाल सुद्धा बाकी पक्षां सारखे राजकारण करणार काय? ह्याची उत्तरे येणारा काळच देईल हे मात्र खरे.


सतीश कुलकर्णी 

वाचा 
 

Saturday, May 24, 2014

0 बुद्धिबळातील प्यादे.



सर्वांना माहित आहे कि  'प्याद' बुद्धिबळातील एक साधा घटक. अगदी 'आम आदमी' सारखा आर के लक्ष्मण च्या कॉमन मैन ची आठवण करून देणारा! याच्याकडे तसे कोणतेही कसब नाही (असा समज असतो ) या प्याद्याची झेप व चाल हि छोटीच - अगदी "कदम कदम बढाये जा" च्या तालावर बेतलेली. तरी सुद्धा फिलिडोर सारखा खेळाडू व लेखक म्हणतो " Pawn is the soul of a game".  आता प्रश्न पडेल कि असं का? फिलीडोरचे म्हणणे तंतोतंत खरे आहे. ‘लहान मूर्ती पण मोठी कीर्ती’ ही म्हण ‘प्याद्या’ ला चपलखपणे लागू होते.

आता हेच बघाना, विरोधकांचे मातब्बर सेनानी, मार्गात एकटे उभे राहून अडविण्याचे ‘बाजीप्रभू’ चे शौर्य हे प्याद दाखविते. ह्या प्यादांचा उपयोग एखाद्या चिलखताप्रमाणे बचावासाठी वा परिस्थितीनुसार होणारे प्रहार झेलण्यासाठी, विरोधकाला आपल्या क्षेत्रात घुसण्यापासून अडथळा निर्माण करण्यासाठी, विरोधकांच्या मोठमोठ्या सोंगट्याचा रस्ता अडवण्यासाठी होतो येव्हाडेच नव्हे तर वेळप्रसंगी राजाला शह देण्यासाठी या प्याद्यांना नेहमी पुढे उभे केले जाते. पटावरील हा 'कॉमन म्याजेव्हा  सारा पट पार करून पलीकडे पोहचून हा सामान्य जेव्हा वजिर (Queening of Pawn ) होतो, तेव्हा त्याचे खरे महत्व कळते. आहे कि नाही “सामान्यातील असामान्यत्व”!

    बुध्दीबळातील ‘प्याद्याप्रमाणे आयुष्याच्या पटावरही सामान्य माणसाला - "कॉमन मेन' ला वजीर होण्याची संधी तेव्हाच मिळते जेव्हा तो विपरीत परिस्थितीची सारी आव्हाने पार करण्यासाठी झगडतो, चांगल्या-वाईटाचे प्रहार झेलतो, सारी क्षमता पणाला लावतो, सगळा पट पार करतो.


रहिमन आपल्या एका दोह्यात म्हणतात,


रहिमन सिधी चाल सो, प्यादा होत वजीर ,
फरजी साह न हुई सके, गती तेढी  तासीर |


प्याद्याच्या ह्या अलौकिक क्षमतेचं मर्म सांगताना रहिमन म्हणतात, प्याद्याला क्षमतेची पूर्ण जाणीव आहे व तो सामान्यच राहू इच्छीतो. त्याच्या सरळ व एका वेळी एकच घर’! अश्या चालीवरून ध्यानात यावे तो वजीर होतो. घोडा मात्र तिरकस चाल असल्यामुळे, तर सरळमार्गी हत्तीची एकापेक्षा जास्त घरे चालण्याच्या रीतीमुळे वजीर होऊ शकत नाही.

इतिहासात अशी अनेक उदाहरणे आपल्याला दिसून येतात. अगदी ताजे उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी – “चायवालेसे देशके पंतप्रधान!” .


दत्तात्रय पटवर्धन 

वाचा 


कबीराचे दोहे
वळून पाहताना भाग 2
अनामिक का सफर भाग 1