मी आणि बाप्या सकाळी फिरायला निघालो. मी बाप्याला विचारले, "जीवन म्हणजे काय?" तो म्हणाला, "जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू यामधील सेतू!"
मी म्हणालो, "बाप्या, मग दु:ख पर्वता एव्हढं आणि सुख जवापाडे असं का?"
बाप्या म्हणाला, "अरे, हा पूल झुलता आहे. ह्यावरून चालताना मन जेव्हढ स्थिर तेव्हढा पूल स्थिर! मन डळमळीत तर पूलही डळमळीत! देवा, मन समाधानी असले कि ते स्थिर होते. मनाचे समाधान जीवनाच्या सहजतेत प्रतिबिंबित होते.
यावर मी त्याला म्हणालो, " बाप्या, मन समाधानी असणं कठीणच, म्हणजे पूल हलता व अस्थिर राहणार! मग सरळ नदीत उडी का घेऊ नये."
बाप्या म्हाणाला, "म्हणजे आत्महत्या! अरे, तुला गालिबचा गझल हा शब्द उच्चारताच एकच नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे मिर्झा असदुल्ला खां गालिब. उंच, धिप्पाड बंध, लालसर गौरवर्ण, भव्य कपाळ अनं किंचित वर आलेली गालाची हाडे. संगीताचा शौकीन, मदिरा-मदिराक्षी नृत्यादी विलासी जीवनाची आसक्ती बाळगणारा गालिब सरदार जाफारींच्या मते स्वभावाने इराणी, धर्माने अरबी, पण शिक्षणाने आणि संस्कृतीने पूर्णतया भारतीय असे काहीसे गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व होते. अत्यंत दुखत दिवस घालावेला गालिब म्हणतो, यारब! जमाना मुझको मिटता हैं किस लिये, लोहे-जहापे हर्फे-मुकर्रर नाही हू मै | जन्म : २७ डिसेम्बर १७९७ मृत्यू : १५ फेब्रुवारी १८६९ शेर आठवतो का?
घबराके के ये कहते है की मर जायेंगे
मरके भी चैन न पाया तो किधर जाएंगे ||
दु:खाला घाबरून मृत्युला कवटाळलं तर एकदाची शांती, मुक्ती प्राप्त होईल असं सर्वांनाच वाटतं. पण मृत्यू तर वस्त्र बदलण्याची क्रिया, दु:खापासून मुक्ती नाही मिळाली तर.. गालिब
Caption विचारतोय कि आत्महत्येनंतरही तुला चैन आणि मुक्ती मिळाली नाही तर? घाबरून जीवनापासून दूर-दूर जाणा-यांना कळत कसं नाही कि जीवन जगण्यासाठी आहे. सारी सुख अनुभवतांना कधी असा विचार करतो कां? मग दु:खाबद्दल वेगळा विचार कां? सुख-दु:खाकडे समभावाने पाहणे जमले तर सुख- जीवन-रुपी पूल नेहमीकरता स्थिर राहील.
मी म्हणालो, "बाप्या गालिबचा सडेतोड प्रश्न अगदी बरोबर आहे. आपली मुक्ती सुख-दु:खाला समभावाने स्वीकारण्यात आहे."
बाप्याने मिर्झा गालिबचा दुसरा शेर पेश केला अन प्रश्नही टाकला ‘दु:खाची इतिश्री मरणातच आहे, हे खरे आहे का?’
कैदे हयात-ओ-बन्दे-गम असलमे दोनों एक है,
मौत से पहले आदमी गमसे नजात

कैदे हयात-ओ-बन्दे-गम असलमे दोनों एक है पाए क्यों?
जीवन आणि दु:ख या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. दु:खाच गाठोडं जीवनाच्या वाटेवर घेऊनच चालायचं असतं नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत.
तुकोबांच्या तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे. भाषेत सांगायचे तर
आपुले मरण पाहिले म्या डोळा | तो जाहला सोहळा अनुपम्य|
आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने | सर्वात्मकपणे भोग जाहला |
दत्तात्रय पटवर्धन
विजया यादव
आजचा सुविचार

आजचा सुविचार
Send Feedback

No comments: