Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.
Showing posts with label बुद्धिबळाचा इतिहास. Show all posts
Showing posts with label बुद्धिबळाचा इतिहास. Show all posts

Sunday, April 19, 2015

0 बुद्धिबळाचा इतिहास भाग 5.


आपण चतुरंग या खेळातील सोंगट्या बाबत पहिले. या सोंगट्या व त्याच्या चाली बद्द्ल आपण पाहू. संस्कृत
काळात या गोट्यांच्या चाली आणि त्यांचे बळ यात फारच अंतर आहे. त्यावेळेसच्या गोट्याचे बळ खूपच कमी होते. सोंगट्या जास्तीती जास्त एक किव्वा दोन घर चालत असत, तोही  एक हत्ती सोडला तर. आज हत्ती , वजीर (राणी), उंट यांचा लांब पल्ल्याचा मारा खेळाला गती देऊन जातो. अगदी दूर बसूनही या सोंगट्या शत्रू पक्षाच्या मोहरांवर नजर ठेऊन असतात, अगदी आजच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राप्रमाणे.

चतुरंग काळात राजा कोणत्याही दिशेला एक घर चालू शकत होता. आजच्या प्रमाणेच त्याकाळीही राजा अत्यंत महत्वाचे मोहरे होते. राजा मारला गेला कि खेळ संपायचा. आजच्या आधुनिक खेळात राजा मारला जात नाही. संकृत काळात राजा वर जर बळ असेल तर याची घोषणा करण्याची गरज नसे. त्यामुळे जर राजाला चेक / शह बसला असेल व ते खेळाडूच्या लक्षात आले नाही तर राजा मारला जायचा. आणि डाव अनपेक्षितपणे संपायचा. एखाद वेळी राजा हा अशा घरात सरकवला जायचा जेथे शत्रू पक्षाचे बळ आहे आणि मग राजा मारला जायचा.
त्यावेळी 'इललीगल चाल' ( illegal move ) ची संकल्पना नव्हती.

पटावरील दुसरी महत्वाची सोंगटी म्हणजे 'मंत्री' . मंत्री म्हणजे राजाचा सल्लागार (next to king ). "मंत्री" या संस्कृत शब्दापासूनच इंग्रजीत 'mentor' , 'monitor' सारखे शब्द आले. 'मंत्री' हि सोंगटी आजच्या 'राणी' ची पूर्वज. या सोंगटी ची चाल म्हणजे एक घर कर्ण रेषेत. समोर, मागे किव्वा बाजूला हा मंत्री चालू शकत नसे. राजाचा सहकारी म्हणून याला राजापेक्षा अर्धे बळ अशी संकल्पना होती.

तिसरे महत्वाचे मोहरे म्हणजे 'गज' (elephant), हे मोहरे आजच्या 'बिशप' चे पूर्वज. हे मोहरे एक घर कर्ण रेषेत किव्वा एक घर पुढे चालू शकत होते. अशा रीतीने 'गज' पाच घरात चालू शकत होता. या मागील संकल्पना अशी कि गजाचे चार पाय कर्ण रेषेत येणाऱ्या चार घरांवर आपले बळ दाखवत असे तर सोंड हि समोरील घरावर बळ प्रस्थापित  करत असे.

'अश्व' हे मोहरे म्हणजे आजचा' 'घोडा'. या घोड्याच्या चालीत आज पर्यंत काहीही बदल झालेला नाही. त्या काळीही घोडा आजच्या प्रमाणेच अडीच घर चालतो.

प्यादे हे एक मोहरे ज्याला एक घर पुढे जाण्याचा अधिकार होता, तसेच शत्रूपक्षाचे मोहरे मारतान पुढील कर्ण रेषेतील घरात मारता येत असे. हे प्यादे पट  पार करून पलीकडे जात असे तेव्हा त्याचे 'मंत्री' या सोंगट मध्ये रूपांतरण होत असे.
'रथ' (chariot ) किव्वा रोका (boat , ship ) हे मोहरे आजच्या हत्तीच्या मोहऱ्याची प्रतिकृती होती. पटावरील हे एकच मोहरे असे होते ज्याला लांब पल्ल्याचामारा करण्याचे बळ होते. 'रोका' ( शिप ) या नावामुळे इतिहास तज्ञांचे म्हणणे असे होते कि भारतीय युद्ध पद्धतीत नौका हि नव्हती त्यामुळे हा खेळ भारताचा नाही. या विवाद बद्दल आपण पुढे पाहूच. तूर्त तरी एवडेच.

Thursday, November 27, 2014

0 बुद्धिबळाचा इतिहास : 1



बुद्धिबळ म्हटले कि आपल्याला महाभारतातील शकुनी, दुर्योधन आणि पांडव यांच्या द्यूताच्या खेळाची आठवण झाल्याशिवाय होत नाही. शकुनीचा तो कपटीपणा, त्याचं महाभारत या टीव्ही धारावाहिक मधील मिश्किल हास्य डोळ्यासमोरून तरळून जातं. द्तुताचा खेळ जो महाभारतात येतो तोच तो चतुरंगचा खेळ. हाच खेळ नंतर  भारत ते पर्शिया आणि पुढे युरोप असा प्रवास करता करता शेवटी आजचा बुद्धिबळ कसा झाला हा इतिहास अगदी रमणीय आहे. भारतातून पर्शियात गेल्यावर त्याच्या सोंगट्या मध्ये कसा बदल झाला. सोंगट्या चे कसे नवीन नामकरण झाले? राणी हि पटावर केव्हा आली व युध्धामैन्दानावर धुडगूस घातला. हे वाचताना मन अगदी रमून जात.

राजकुमारी अना कॉमनेना  ( Anna Comnena ) हिने आपल्या वडिलांचं  चरित्र लिहिलं. त्यात तिने वर्णन केलं कि बुद्धिबळ हा खेळ ग्रीस मध्ये अरब्स देशातून आला. ग्रीस देशात या खेळला Zatrikion म्हटले जात होते. अरेबियांस नि हा खेळ पर्शियनकडून  घेतला  व पर्शियात हा खेळ भारतातून आला. पर्शिया मध्ये हा खेळ राजा खुसरो ने आणला ज्याने पर्शियावर ४८ वर्ष्ये राज्य केले.

याचा विचार करून जर भारतात या खेळाची मुळं तपासली तर  लक्षात येते कि हा खेळ इ.सनाच्या ३००० वर्षे पूर्वीचा आहे., भविष्य पुराणात उल्लेख आहे कि राजा युधिष्ठीर व्यासांना विचारतो कि हा खेळ कसा खेळायचा, याच्या चाली कशा आहेत?
त्यावर व्यास , सोंगट्यानची   रचना कशी करायची हे सांगतात.. नंतर राजा हा कसा महत्वाचा आणि त्याची रक्षा कशी जरुरीची हे सांगतात. फासा  फेकल्यावर जर ५ आकडा आला तर राजा किव्वा एक प्यादे सरकवायचे, जर चार आकडा आला तर हत्ती, आणि तीन आकडा आला तर घोडा तसेच दोन आकडा आल्यावर शिप (उंट) सरकवायचा." पुढे व्यास प्रत्येक सोंगट्यानची चाल समजावतात. राजा एक घर कोणत्याही दिशेला चालतो. प्यादे एक घर पुढे आणि मारताना एक घर तिरकस, पुढील घरात. हत्ती त्याच्या इच्छेनुसार आडवा/ उभा कितीही घरं चालू शकतो ( फक्त रस्ता मोकळा असणे आवश्यक आहे).
शिप (बिशप ) फक्त दोन खरं तिरकस कोणत्याची दिशेला सरकू शकतो.  आणि घोडा हा अडीच घरं चालतो. राजा हा एक घर कोणत्याही दिशेने सरकतो."
अर्थात सध्याच्या खेळात कही सोंगट्याच्या  चाली  बदलल्या  आहेत.
चतुरंग म्हणंजे सैन्याचे चार भाग. 'चतुर' म्हणजे 'चार' आणि 'अंग' म्हणजे 'भाग'.  पायदळ, घोडदल, हत्ती आणि शिप ( chariots ) , एक राजा आणि त्याचा general  यांचा मिळून हा खेळ. हिंदू पुरातन युद्धपद्धतीच  हे एक चित्र.
व्यासांच्या वरील वर्णावरून लक्षात येत कि त्याकाळी राणी हि पटावर नव्हती. त्यामुळे राणीची पटावरील धमाल नव्हती. खेळ कसा निरस असेल ना?  बिशप ची चाल हि लिमिटेड होती. फक्त हत्ती हेच एक दूर पल्ल्याचं मिसाइल होतं. याच हत्तीला  'highway lover ' असेही संबोधतात. त्यामुळे हत्ती सोडला तर बाकीच्या सोंगट्यानची चाल मर्यादितच होती म्हणून  खेळात एकप्रकारचा रटाळपणा असावा. त्या काळी भारतात इतिहास लिहिण्याचा शिरस्ता नव्हता त्यामुळे याची पाळेमुळ शोधन कठीण  जातं. परंतु सहाव्या शतकात जेव्हा हा खेळ पर्शियात गेला तेव्हा या खेळाची माहिती इतिहासात मिळते. त्याकाळी सोंगट्या चित्रात दाखवल्याप्रमाणे मांडतात.