Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Thursday, December 18, 2014

0 पेशावर मध्ये विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या.

पेशावर मधील आर्मी स्कूल मध्ये बेछूट गोळीबार करून १३२ विद्यार्थ्यांची हत्या करण्याची बातमी जगभर पसरली आणि जग स्तब्ध झाले. प्रत्येकाच्या  मनात एकच प्रश्न  डोकावू लागला, मग आपण civilised कि uncivilised ? पेशावर मधील वारसक रस्त्यावरील हि शाळा पाकिस्तानी लष्करातर्फे चालवण्यात येते. या शाळेच्या परीक्षा सुरु होत्या आणि मंगळवारी  सकाळी साडे दहाच्या सुमारास  हा हल्ला करण्यात आला. निष्पाप विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या करण्याचे पापकृत्य घडवून आणले.
असे म्हणतात, Everything is fair in love and war . परंतु अशा युद्धाचेही काही नियम असतात उदा. नागरिक वस्तीत बॉम्ब हल्ला करू नये, दवाखान्यावर बॉम्ब हल्ला करू नये, जखमी सैनिकांना घेऊन जाणाऱ्या अम्बुलन्स वर बॉम्ब  हल्ला करू नये इ. युद्धाचेही  असे नियम असताना  आपण निष्पाप विद्यार्थ्याची हत्या करण्यापर्यंत मजल मारली.
पाकिस्तान मधील घटना ऐकल्यावर फैज अहमद "फैज" यांचा एक शेर आठवला. पाक हुकुमशाहीच वर्णन करताना त्यांनी म्हटले होते,

है लबरेज आहोँसे ठंडी हवाएँ,
उदासी में डूबी हुई है घटाए
मुहब्बत की दुनिया में शाम आ चुकी है,
सिह्यपोश है जिंदगी की फ़िज़ाए |

"हे असह्य गारठ्याच वातावरण दु:क्ख पूर्ण निश्वासांनी  कसं ओतप्रोत भरून गेलाय... कृष्ण घनमेघ कालोखांमुळे आणखीनच उदासवाणे भासताहेत .... प्रेमाच्या साम्राज्यात जणू सायंकाळ अंधारून आल्यागत झालंय .... सारं कसं आयुष्यच काळोखामुळे झाकोळून (सियहपोश)   टाकल्यागत झालंय ---- स्वातंत्र्याचा प्रकाशाच जणू नाहीसा झालाय  आणि सगळीकडे अंधारून आलाय"  आजही हे शब्द  पाकिस्तान च्या बाबतीत तंतोतंत लागू होतात.

परंतु याच वेळेस मरहूम साहीर लुधियानवी यांच्या 'जंग टलती रहे तो बेहतर है" या काव्याची  आठवण झाली, ते म्हणतात,

खून अपना हो या पराया हो ,
नस्ले आदम का खून है आखिर
जंग मश्रिक़ में हो के मगरिब में
आमने-आलम का खून है आखिर ||

बम घरोंपर गिरे के सरहद पर
रूहें-तामीर जख्म खाती है
खेत अपने जले की औरोंके
जीस्त फाको से तिलमिलाती है ||

टैंक आगे बढे की पीछे हटे
कोख धरती की बाँझ होती है
फतह का जश्न हो के हार का सोग
जिंदगी मय्यतो पे रोती  है ||

जंग तो खुदही इक मसअला है
जंग क्या मसलो का हल देगी
आग और खून आज बख्शेगी
भूख और एहतियाज कल देगी ||

इसलिए ए शरीफ इंसानो !
जंग टलती रहे तो बेहतर है,
आप और हम सभी के आँगन में
शम्मा जलती रहे तो बेहतर है||

आपण यातुन केव्हा शिकवण घेणार कोणास ठाऊक?

No comments: