tag:blogger.com,1999:blog-5425053186257712369.post3524915608210860209..comments2024-02-13T00:32:46.050-08:00Comments on अभिव्यक्ति इंडिया : प्रेमा तुझा रंग कसा?Anonymoushttp://www.blogger.com/profile/09887986186139565061noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-5425053186257712369.post-80937146597143050542014-07-09T16:34:00.261-07:002014-07-09T16:34:00.261-07:00' प्रेमा तुझा रंग कसा?' या नाटकाचं तारुण्य...' प्रेमा तुझा रंग कसा?' या नाटकाचं तारुण्य टिकण्याचं कारण त्याच्यातल्या भाबड्या रोमँटिसिझममध्ये आहे. प्रा. बल्लाळ आणि त्यांची पत्नी प्रियंवदा हे पन्नाशीतलं जोडपं, त्यांची मुलगी बब्बड आणि तिच्या प्रेमात पडून तिच्याशी लग्न करणारा बाजीराव (कोळसेवाला) ही युवा जोडी, दरवेळी नवनव्या मुलीच्या प्रेमात पडून आपटणारा बच्चू आणि प्रेमाच्या उच्छृंखल कल्पनेत कधीतरी त्याच्याजवळ येऊन दूर निघून गेलेली सुशील हे आणखी दोन तरुण जीव अशा तीन जोड्यांच्या उपयोजनेतून कानेटकर प्रेमाचा खेळ आपल्यासमोर मांडतात. प्रेमातली परिपूतीर्, राग-अनुराग आणि प्रेमातली अतृप्ती अशा तीन अवस्थांचं त्या प्रतिनिधीत्व करतात. शिवाय त्याग, अशरीरी प्रेम, एकतफीर् प्रेम अशाही प्रेमाच्या छटा असतात. त्यासाठी आजारी बायकोचा संसार करणारे नीळकंठ गोरे (बाजीरावचे वडील) अशीही एक व्यक्तिरेखा आहे. या सात माणसांत कानेटकरांनी प्रेमाचे ठळक पॅटर्न बसवले आहेत आणि त्यांच्यावाटे प्रेमाचे जवळपास सर्व रंग दाखवले आहेत. ही सगळी माणसं सरळमागीर्. त्यांचे रागही लटकेपणाने व्यक्त होतात किंवा माफक ताणले जातात. त्यात अहंकार आहे, तोही माफक. त्यामुळे सगळ्या गोष्टींत चांगुलपणाचा धागा कायम राहतो, जो मध्यममागीर् आणि दुसऱ्याचं भलं व्हावं, असं वाटणाऱ्या प्रेक्षकांना हवाहवासा वाटतो. प्रा. बल्लाळांची दोन्ही मुलं प्रेमात पडतात तेव्हा मुलांच्या आईचा त्यांना कडाडून विरोध होतो मात्र बल्लाळांचा मूक पाठिंबा मिळतो. यानिमित्ताने जी मुक्ताफळं उधळली जातात, जे युक्तिवाद आणि प्रतिवाद होतात ते तसेच कधीतरी बल्लाळ आणि प्रियंवदा यांचे त्यांच्या प्रेमाला विरोध करणाऱ्या पालकांशी झडलेले असतात. प्रेमाच्या बाबतीत होणारी इतिहासाची पुनरावृत्ती कानेटकर नेमके हेरतात आणि अशा पद्धतीने ती नाटकात जागोजागी पेरतात की पाहणाऱ्याला तो कुठल्याही भूमिकेत असला तरी गुदगुल्या होतातच. <br /><br />धन्यवाद !Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5425053186257712369.post-781211331592608462014-07-09T03:47:34.670-07:002014-07-09T03:47:34.670-07:00स्त्री पुरुषांच्या आकर्षणाच आणि प्रितीच नाटक जगाच्...स्त्री पुरुषांच्या आकर्षणाच आणि प्रितीच नाटक जगाच्या रंगभूमीवर सतत चाललेलं आहे आणि चालणार आहे. ते सुरु केव्हा झालं आणि संपणार केव्हा ते सांगता येणारं नाही असा या नाटकाचा संदेश आहे. हा संदेश अशा काही मर्मज्ञ, रसिक, सहानुभूतीपूर्ण, खेळकर क्वचित अवखळ शैलीनं लेखकानं रंगविला आहे कि त्याची हि हास्य प्रधान नाट्यकृती सुरु केव्हा झाली आणि केव्हा संपली ते हशा आणि टाळ्या च्या जल्लोषात प्रेक्षकांना कळणार सुद्धा नाही.<br /><br />ना. सी. फडके Anonymoushttps://www.blogger.com/profile/16041999736360222539noreply@blogger.com