Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Saturday, June 27, 2015

0 शायरीचा गुलदस्ता भाग १५




मला उर्दू शायरीचे वेड केव्हा लागले हे निश्चित आठवत नाही. बहुदा शालेय वयातच माझा आणि उर्दू शायरीचा संबंध आला असावा. उन्हाळ्याच्या सुटीत असाच एक पुस्तक  वाचत बसलो  होतो आणि एक शेर वाचण्यात आला. उन्हाळा सुरु असल्यामुळे हवा मुळीच नव्हती. झाडाच पानही हलत नव्हत. या कडाक्याच्या उन्हात सर्वजण हवेच्या झुळूकीची वाट पाहत असत.हवेची जराशी झुळूक आली कि अगदी हायसं वाटायचं. तो शेर मी दोन तीन वेळा वाचला आणि अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. शेर असा होता,

हवा चले ना चले लोग इंतजार में है ,
खुली हुवी है अभी, खिडकिया मकानो की.            ----  कैसरुल जाफरी

मला वाटले की लोकांनी घराच्या खिडक्या उघडून ठेवल्या आहेत. कारण गर्मी खुप आहे. हवा येवो अथवा ना येवो परन्तु लोकांची प्रतीक्षा चालूच आहे. आणि वरवर पाहता मला वाटलं की कविने याच परिस्थितीचे वर्णन केलेलं असावं.

पुढे मोठा झालो विचारांची खोली वाढली आणि लक्षात आलं की या दोन ओळींच्या मध्ये खूप काही दडलं आहे. मग हि हवा कसली तर हि हवा आहे बेहतर जीवनाची, सच्चाई ची, बेहतर समाजाची, खुशाली ची अगदी सध्याच्या BJP च्या " अच्चे दिन आनेवाले है" या घोषणेत दडलेल्या विचारांची. आता 'खिडकिया मकानोकी' याचा संकेत कुठे आहे, तर तो ' रुधयाची कवाडे,' बुद्धीची कवाडे ' याकडे  आहे.

म्हणजेच 'अच्चे दिन आनेवाले है' या प्रतीक्षेत लोकं आपल्या हृदयाची कवाडे उघडून बसली आहेत. रामराज्य यईल, सर्वदूर न्यायाचा बोलबाला असेल, समाजात असलेली श्रीमंत गरीब यांच्या तील दरी नष्ट होईल, समाजातील असमानातेला तिलांजली दिली जाईल. जगात
खुशाली नांदेल. अशा हवेच्या प्रतीक्षेत माणसे आपल्या घराची दारे, खिडक्या  उघडून बसले आहेत. आशा आहे या जगाच नंदनवन होण्याची , उम्मीद अजून बरकरार आहे. अशी शायरी वाचली कि वाटतं मातीच्या इवल्याश्या भांड्यात जणू समुद्र भरून ठेवला आहे.

उर्दू शायरी मध्ये अथवा कोणत्याही कवितेत संकेत कोठे आहे हे कळणे महत्वाचे असते. शायर आपल्याला कोणत्या दिशेने नेत आहे याची जाण यावी लागते. 


 दत्तात्रय पटवर्धन

Tuesday, June 16, 2015

0 शायरीचा गुलदस्ता भाग १४



भाग ११ मध्ये आपण पाहिले कि चिराग हा शब्द कसा वेगवेगळ्या संकेताने वापरला जातो.आज एका घटनेमुळे एका उर्दू शेर ची आठवण झाली. घटना अशी कि दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्र तोमर यांना पोलिसांनी फर्जी डिग्री असल्याबाबत अटक केली.कायदे मंत्री याची वकिलीची डिग्री खोटी हा केव्हडा मोठा अपराध. परंतु या अटकेचे समर्थन करण्या ऐवजी  अरविंद केसरीवाल यांनी या अटकेची निंदा करण्यास सुरवात केली. केद्र सरकार वर आरोप ठेवण्यात आलेत. आप पार्टीला बदनाम करण्यासाठी भाजप ची हि कुटनीती आहे. अरविंद केसरीवाल  यांनी आप पार्टीची स्थापना केली होती ती भ्रष्टाचार निर्मुलन करण्यासाठी. आणि त्याच्या कायदे मंत्रीच खोट्या डिग्री बाबत जेल मध्ये गेला आणि आप पार्टीच्या या विचारधारेला काळिमा फासला. जितेंद्र तोमर आणि समर्थन करणारे सर्वच आप पार्टीचे वंशाचे दिवे.

शायर म्हणतो,

दिल के फफोले जल उठे सीने के दाग़ से
इस घरको आग लग गई, घरके चराग से.               अज्ञात

आधीच हृदयात असलेले फ़फ़ोले त्याची आग असह्य. त्यात असा डाग, मग त्या आगीची तीव्रता अधिक भडकणार नाही तर काय? वंशाच्या दिव्यानेच घराला आग लावली काय करणार?

येथे चिराग या शब्दाचा अर्थ "वंशाचा दिवा" असा होतो.




चिराग या शब्दाचा उपयोग केलेला असाच एक शेर मला आठवतो,

शब-ए-इंतजार की कश्मकश में न पूछ कैसे सहर हुई,
कभी इक चराग जला दिया, कभी इक चराग बुझा दिया.                 मजरूह

येथे चिराग या शब्दाचा सांकेतिक अर्थ  स्वप्नांचा चिराग, आशेचा चिराग, असा आहे.

शब-ए-इंतजार च्या कश्मकश ( उलझन) मध्ये सकाळ  कशी झाली  म्हणून काय सांगू!  कधी एक दिवा  प्रज्वलित केला तर कधी एक दिवा विझवला. म्हणजेच  एक स्वप्न पाहिलं ते बाजूला सारलं मग दुसरं स्वप्न पाहिलं तेही बाजूला केलं. मग तिसर, चौथ अशी स्वप्नांची श्रुखलाच निर्माण झाली आणि सकाळ केव्हा झाली आम्हाला कळलंच नाही.
ज्यावेळेला आयुष्यात काही काळासाठी अंधकार निर्माण  होतो त्यावेळेस स्वप्न फार महत्वाची ठरतात. It acts as buffer between you and the situation.


दत्तात्रय पटवर्धन


Thursday, June 11, 2015

0 शायरीचा गुलदस्ता भाग १३



जगात काही माणसे आभाळा एव्हडं काम करून जातात. सर्वच माणसे इच्छा असून देखील भव्य दिव्य काम करू शकत नाहीत. परंतु काही माणसे रस्त्यातून जाताना रस्त्यातील काटे उचलण्याचे काम करतात जेणे करून त्यांच्या मागून येणाऱ्यांना त्या काट्यांचा त्रास होऊ नये. व अशा लोकांना काही काटे कमी करण्याच श्रेय द्याव लागत. अशा रीतीने प्रत्येक व्यक्ती काहीना काही योग्य कार्य करून या जगाला सुंदर करीत असते.

साहीर लुधियानवी यांचा एक शेर याच गोष्टीचा उहापोह करतो,

माना की इस जमीं को न गुलजार कर सके,
कुछ ख्वार कम तो कर गए, गुजरे जिधर से हम.

साहिरजी म्हणतात, "आम्ही या जगाच नंदनवन तर करू शकलो नाही परंतु ज्या ज्या मार्गावरून आम्ही प्रवास केला त्या मार्गातील काही काटे कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच केला." कुछ ख्वार, येथे हाही अहंकार बाळगलेला नाही कि सर्व काटे दूर केले. आम्हाला शक्य होते तितके केले.


सर्व प्रथम ज्या व्यक्तीने आपल्या घराबाहेर रात्रीच्या वेळेस दिवा लावण्यास सुरवात केली तेव्हा त्या व्यक्तीची सर्वांनी थट्टा केली. त्याच मार्गावरून जाताना  ज्या ज्या लोकांना त्या दिव्याच्या उजेडामुळे मार्गक्रमण करण्यास मदत झाली त्यांनीही आपल्या घराबाहेर दिवा लावण्यास सुरुवात केली आणि येथूनच स्ट्रीट लाईट ची कल्पना जगासमोर आली. आज त्या व्यक्तीच्या या छोट्याश्या कृत्यामुळे आम्हाला स्ट्रीट लाईट मिळाले. हे जग सुंदर होण्यास मदत झाली. असेच रात्यावरून काटे वेचत चला एक दिवस नक्कीच या जगाच नंदनवन होईल.जगाच नंदनवन करण्यात आपलाही खारीचा वाटा असावा.

जां निसार खां अख्तर यांचाहि असाच एक शेर आहे.

जिंदगी ये तो  नहीं तुमको सवारा ही न हो,
कुछ न कुछ कर्ज तेरा हमने उतारा ही न हो.

मान्य आहे कि  निसर्गाने आम्हाला भरभरुन दिलेलं आहे.  या जीवनाचे आमच्या वर खूप उपकार आहेत. परंतु हे जीवन सुंदर करण्यास आम्ही काहीच केले नाही असे नाही. हे उपकार, कर्ज फेडण्यासाठी आम्हीही काहीना काही केलेलं आहे. आमचा खारीचा वाटा नक्कीच थोडं कर्ज उतरवण्याच काम करीत आहे.

दत्तात्रय पटवर्धन.

Tuesday, June 2, 2015

0 शायरीचा गुलदस्ता भाग 12



मैत्री म्हटली कि ती मैत्री निभावण्याच्या आणाभाका , त्या शपथा, आठवतात. अनेक वेळा काहीना काही कारणावरून दिलेला शब्द  निभावता येत नाही  आणि मैत्री तुटते. या आणाभाका ज्याला उर्दूत 'वफा' म्हणतात आणि त्याविरुद्ध म्हणजे 'जफा'.
वफा आणि जफा या दोन शब्दांचा उपयोग  उर्दू शायरीत अनेक वेळा केलेला आढळतो. प्रेमावर जितकी शायरी आहे तितकीच शायरी वफा आणि  जफा वर आहे.

आता हाच शेर पहा,

जफ़ा के जिक्र पे तुम क्यो  संभल के बैठ गए,
तुम्हारी बात नहीं, बात है ज़माने की .                                          मजरूह सुल्तानपुरी

असे म्हणतात की truth should be sugar coated,  कारण सत्य गिळण्यास कठीण असतं. येथे शायर एक sugar coated pill आपल्याशी जफा (शपथेचा भंग करणाऱ्याला ) करणाऱ्याला देत आहे. तो म्हणतो की जेव्हा जफा ची ( जुलुमाची, शपथ तोडल्याची ) चर्चा सुरु झाली त्यावेळेस तू स्वतःला सावरून बसलीस. कारण तुला भीती होती की कुठे यात तुझंही नाव तर येणार नाहीना? तुलाही माहित आहे  की घेतलेल्या शपथेचा भंग कोणी केला. तुझी ती दयनीय स्थिती बघवली नाही व मी तुला इशारा केला की आंम्ही तुझी  गोष्ट करीत नाहीत,  be comfortable, be relaxed, आम्ही तर जगाची गोष्ट  करीत आहोत की हे जग किती जुलमी आहे. किती सौम्य रीतीने शायर तिच्या तोडलेल्या शपथेची कल्पना तिला करून देत आहे.

रंज तो ये है की वो अहले-वफ़ा टूट गया,
बेवफा कोइ भी हो, तुम न सही, हम ही सही.                              डॉ राही मासूम रझा

मैत्रीत केलेल्या आणाभाका अनेक वेळा तुटतात, त्याला नक्कीच कोणी न कोणी जवाबदार असतो. शायर म्हणतो की आपली मैत्री तुटली याच मला दु:ख आहे. आपण मैत्री निभाऊ शकलो नाही हीच जीवनाची tragedy  आहे. मग हि मैत्री कोणामुळे तुटली हा भाग दुय्यम आहे. तुझ्यामुळे नाही तर मान्य आहे की माझ्यामुळेच हे झाले. या वर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. आपली मैत्री तुटली हीच एक गोष्ट सत्य आही आणि त्याचच मला दु:ख आहे.

मेहबूब से भी हमने निभाई बराबरी,
वां लुत्फ़ कम  हुवा, तो यहाँ प्यार कम हुवा.                             मोमिन खां मोमिन

लुत्फ़ : आनंद, मजा , मिठास

शायर म्हणतो की मेहबूब बरोबर आम्ही बरोबरी निभावली. तिकडे लुत्फ़ कमी झाला म्हणजेच तिच्यातल सौंदर्य कमी झालं , तिच्या बरोबर बसण्यात आणि गप्पा मारण्यातला आनंद कमी झाला, तिच्यातली मिठास कमी झाली म्हणून आमच् प्रेमही कमी झालं. असा अर्थ आपण लुत्फ़ चा डिक्शनरी अर्थ घेतल्यास काढू. इथेही शायर एक sugar coated pill देत आहे. येथे लुत्फ अर्थ आहे वफाई कडे. तो म्हणतो की तिकडे वफा कमी झाली आणि त्याच प्रमाणात इकडे प्रेमही कमी झाले. अशा रीतीने आम्ही बरोबरी निभावून नेली. अप्रत्यक्षरित्या शायर दोष आपल्या कडे ठेवून तिला तिच्या बेवफाईची  जाणीव करून देत आहे.


दत्तात्रय पटवर्धन